AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचे असे करा व्यवस्थापन, वेळेत बहरतील पिके अन् उत्पादनातही वाढ

सध्या रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पहिल्या मशागतीची कामेही सुरु झालीआहेत. पेरणीपासूनच योग्य नियोजन केले तर पुढे उत्पादनात वाढ होणार आहे. खताचे नियोजन हे पिकाच्या अवस्थेनुसार ठरते. पण पाण्याचे योग्य नियोजन हे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचा भाग आहे.

रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचे असे करा व्यवस्थापन, वेळेत बहरतील पिके अन् उत्पादनातही वाढ
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 17, 2021 | 9:00 AM
Share

लातूर : सध्या (Rabi season) रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पहिल्या मशागतीची कामेही सुरु झालीआहेत. पेरणीपासूनच योग्य नियोजन केले तर पुढे (production) उत्पादनात वाढ होणार आहे. खताचे नियोजन हे पिकाच्या अवस्थेनुसार ठरते. पण (water management) पाण्याचे योग्य नियोजन हे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रत्येक पिकाला त्याच्या अवस्थेनुसार पाणी देणे गरजेचे असते. मात्र, पाणी मुबलक प्रमाणात आहे म्हणून देणे हे देखील चुकीचे आहे. आजही शेतकरी पाण्याच्या नियोजनबद्दल तत्पर नाही. त्यामुळे योग्य वेळी पाण्याचे नियोजन कसे करावे याची माहिती घेणार आहोत.

पाणी व्यवस्थापन

पाण्याचे व्यवस्थापन हे शेतजमिनीच्या दर्जानुसार ठरत असते. चांगल्या प्रतिच्या जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळ्या ह्या रब्बी हंगामात घ्याव्याच लागतात. एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे .

रब्बी ज्वारी

ज्वारी हे या हंगामातील मुख्य पिक आहे. सर्वसाधारणपणे 70 ते 75 दिवसांत ज्वारी ही फुलोऱ्यात येते. ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. एवढेच नाही तर कणसाचे वजन वाढते व ज्वारीचा दर्जा सुधारतो. पेरणीनंतर महिन्याभराने ज्वारीची वाढ जोमात असते. त्या दरम्यान पाणी दिले वाढ होण्यास अणखीन मदत होते. तर ज्वारी पोटरीत असताना दुसरे पाणी दिले तर दाणे भरण्यापर्यंत पुन्हा देण्याची देण्याची आवश्यकता भासणार नाही. ज्वारीच्या कणसात 90 ते 95 दिवसांनी दाणे भरण्यास सुरवात होते. त्यावेळी पाणी दिल्यास उत्पादनात वाढ तर होणार आहेच शिवाय काढणीच्या दरम्यान सोयीस्कर होणार आहे. शक्यतो तीन पाण्यातच ज्वारी पिक हे पदरात पडते पण जिरायत क्षेत्रावर गरज भासल्यास चौथे पाणी द्यावे

हरभरा

जिरायती क्षेत्रात ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर फुले येऊ लागताना द्यावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरी पाणी द्यावे. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीला भळी पडण्याच्या आत पाणी द्यावे. हरभऱ्यास प्रमाणशीर पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. तर स्प्रिंक्लरने पाणी दिल्यास उत्पादन चांगली वाढ होते.

सूर्यफूल

यंदा मराठवाड्यात सुर्यफूलाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याचा अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात, उत्पादनात घट येते.

संबंधित बातम्या :

आता एकच पर्याय..! शेतकरीच ठरवणार शेतीमालाचा दर, द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची एकजूट

सोयाबीनची आवक वाढतेय दर मात्र चिंताजनक, शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला ?

पंतप्रधान मोदींनी दिला कमी खर्चात अधिकच्या शेती उत्पादनाचा कानमंत्र..! 80 टक्के शेतकऱ्यांना होणार फायदा

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...