AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

जमिन क्षेत्राचा उल्लेख सातबाऱ्यावर आहे पण पोटखराबा म्हणून, त्यामुळे अशा जमिनी शेतकऱ्यांना वहित अर्थात वापरात आणत्या येत नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांपासून अशा पोटखराबा जमिनीबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेण्याच्या तयारीत होते. सातबाऱ्यावर पोटखराबा असा उल्लेख ब्रिटीश काळापासून आहे. आता पोटखराबा हा उल्लेखच हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ही जमिन देखील शेतकऱ्यांना वहित करता येणार आहे.

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 21, 2022 | 2:28 PM
Share

जळगाव : (Farm Land) जमिन क्षेत्राचा उल्लेख सातबाऱ्यावर आहे पण पोटखराबा म्हणून, त्यामुळे अशा जमिनी शेतकऱ्यांना वहित अर्थात वापरात आणत्या येत नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांपासून अशा पोटखराबा जमिनीबाबत (State Government) राज्य सरकार योग्य तो निर्णय घेण्याच्या तयारीत होते. सातबाऱ्यावर पोटखराबा असा उल्लेख ब्रिटीश काळापासून आहे. आता पोटखराबा हा उल्लेखच हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ही जमिन देखील (Farmer) शेतकऱ्यांना वहित करता येणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार असून सुरवातीला जळगावात हा उपक्रम सुरु केला जाणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया कसे असेल याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पोटखराबा क्षेत्राचा उल्लेख वहिवाटाखालील क्षेत्रात केला जाणार आहे.

पोटखराबा म्हणजे काय?

शेतकऱ्यांच्या जमिन क्षेत्रातूनच ओढे, नाले यांची उभारणी केली जाते. ही कामे शासनाच्या माध्यमातून होत असली तरी प्रत्यक्षात ही जमिन वहिवाटाखाली आणणे शक्य नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनी असूनही त्याचा वापर हा करता येत नव्हता. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर झाली तर क्षेत्रही वाढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.

कशी होणार आहे प्रक्रिया?

-महसूल विभागाअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सुरवातीला तलाठी पाहणी करणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना 16 प्रकराचे अर्ज तलाठ्यांकडे जमा करावे लगणार आहेत. – पोटखराबा जमिन वहिवाटाखाली आणण्यासाठी तलाठी गावातील गट क्रमांक निहाय जमिनीची माहिती संकलित करावी लागणार आहे. – यानंतर जबाब,पंचनामा आणि हस्तकेच नकाशा तयार करावा लागणार आहे. हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे. – मंडळ अधिकारी देखील या अहवालातील 10 टक्के गट शिवारातील पाहणी करतील आणि आपल्या अभिप्राय हा तहसीलदार यांना देतील. – तहसीलदार हे गावनिहाय माहिती ही उपअधीक्षक भूमीअभिलेख यांच्याकडे अभिप्रायसाठी पाठविणार आहेत. यानंतर भूमी अभिलेखचे उपअधीक्षक हेच पोटखराबा जमिन वहिवाटाखाली येणार का नाही यासंबंधी अहवाल तहसीलदार यांना देणार आहेत. – या प्रक्रियेत तहसीलदार यांचीही भूमिकाही महत्वाची आहे. – अंतिम टप्प्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडून अहवाल हा तहसीलदार, तलाठी यांच्याकडे आल्यानंतर यावर पोटखराबा क्षेत्र हे वहिवाटाखाली आल्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.