AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi Festival : सणामुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार राहणार बंद, शेतीमालाचे काय?

सध्या खरिपासह रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक वाढली आहे. शिवाय खरेदी केंद्राचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे. खरिपातील सोयाबीन, तूर या मुख्य पिकांची तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असताना आता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार हे होळीनिमित्त बंद असणार आहेत. मध्यंतरी दीपावलीमुळे काही दिवस व्यवहार हे बंद होते तर आता होळीमुळे राज्यातील लातूर, लासलगाव, सोलापूर, मालेगाव, नाशिक या बाजार समित्यांचा समावेश आहे.

Holi Festival : सणामुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार राहणार बंद, शेतीमालाचे काय?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अशाप्रकारे सूचना देण्यात आली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 17, 2022 | 5:05 AM
Share

लातूर : सध्या खरिपासह (Rabi Season) रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक वाढली आहे. शिवाय खरेदी केंद्राचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे. खरिपातील सोयाबीन, तूर या मुख्य पिकांची तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असताना आता राज्यातील (Agricultural Market Committee) कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार हे (Holi Festival) होळीनिमित्त बंद असणार आहेत. मध्यंतरी दीपावलीमुळे काही दिवस व्यवहार हे बंद होते तर आता होळीमुळे राज्यातील लातूर, लासलगाव, सोलापूर, मालेगाव, नाशिक या बाजार समित्यांचा समावेश आहे. दरवर्षी होळीनिमित्त बाजार समित्या ह्या बंद असतात. यामध्ये पणन महामंडळाचा महत्वाची भूमिका असते पण स्थानिक पातळीवर हा निर्णय बाजार समिती प्रशासनच घेते. त्यामुळे काही बाजार समित्या ह्या दोन दिवसासाठी तर काही 5 दिवसांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र, चांगलीच पंचाईत होणार आहे.

कोणत्या बाजार समितीचा काय आहे निर्णय?

होळी निमित्त लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे 5 दिवस बंद असणार आहेत. गुरुवारपासून येथील व्यवहार बंद राहणार आहेत. सलग पाच दिवस व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. भाजीपाला आणि फळांचे व्यवहार सुरु राहणार आहेत. तर कांदा नगरी असलेल्या लासलगावातील कांद्याचे व्यवहार हे दोन बंद राहणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या निर्णय हा स्थानिक पातळीवर झालेला आहे.

पुणे बाजार समित्याचे व्यवहार राहणार सुरु

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. मध्यंतरी दीपावली दरम्यान येथील बाजारपेठ ही तीन दिवस बंद होती. मात्र, सध्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शेतीमालाचे काय होणार?

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद राहणार असले तरी भाजीपाला आणि इतर किरकोळ व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यातच काही बाजार समित्या ह्या 5 दिवस तर काही 2 दिवस बंद राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. आता या बंद नंतर शेतीमालाचे काय दर राहणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Poultry Business : कुक्कुटपालन व्यवसायाला पुन्हा घरघर, सरकारचा हस्तक्षेपानंतरच मिळणार नवसंजीवनी..!

Cotton Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी दर, नेमका फायदा कुणाला?

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढले दर, सोयाबीनचे काय चित्र?

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक