AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ई-सांतामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, जाणून घ्या ई-सांता आणि त्याचे फायदे

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर (एनएसीएसए) ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एमपीएडीए) ची विस्तारीत शाखा आहे. (E-Santa will increase farmers income, know about e-Santa and its benefits)

ई-सांतामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, जाणून घ्या ई-सांता आणि त्याचे फायदे
ई-सांतामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल
| Updated on: Apr 14, 2021 | 3:54 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी मंगळवारी व्हर्चुअल माध्यमातून ई-सांता या इलेक्ट्रॉनिक मार्केट प्लेस सुरु केले. हे मच्छिमार आणि खरेदीदार यांना जोडण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल. त्याचबरोबर यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल. याशिवाय संपर्क वाढवण्याची क्षमताही वाढेल, जेणेकरुन निर्यातकांना थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार उत्पादने खरेदी करता येतील. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ट्रेसिबिलिटी महत्त्वपूर्ण घटक आहे. ई-सांता टर्म वेबपोर्टलसाठी बनवले गेले आहे, ज्यात जलचर क्षेत्रामध्ये एनएसीएसए फार्मर्स ट्रेडिंग ऑगमेंटिंग इलेक्ट्रॉनिक सोल्युशन आहे. नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर (एनएसीएसए) ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एमपीएडीए) ची विस्तारीत शाखा आहे. (E-Santa will increase farmers income, know about e-Santa and its benefits)

यावेळी गोयल म्हणाले की, ई-सांता मच्छीमारांना मिळकत, जीवनशैली, स्वावलंबीपणा, गुणवत्ता पातळी, ट्रेसिबिलिटी आणि नवीन पर्याय प्रदान करेल. ते पुढे म्हणाले की, हे व्यासपीठ अधिक औपचारिक आणि कायदेशीर बंधनकारक होण्यासाठी मौखिक मार्गाने पारंपारिक व्यापारात बदल करेल. ते म्हणाले की ई-सांता पुढील मार्गाने शेतकर्‍यांचे आयुष्य आणि उत्पन्न वाढवेल.

– जोखीम कमी करेल – उत्पादने आणि बाजारपेठेविषयी जागरुकता – उत्पन्नामध्ये वाढ – चुकीच्या गोष्टींविरुद्ध निषेध – प्रक्रियेत सहजता

दलालांना दूर ठेवेल

गोयल पुढे म्हणाले की, ई-सांता हा मार्केट विभाजन संपविण्याचा डिजिटल पूल आहे आणि हे दलालांना दूर करून शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात पर्यायी विपणन साधन म्हणून काम करेल. हे शेतकरी आणि निर्यातदार यांच्यात कॅशलेस, कनेक्टिव्हिटी आणि पेपरलेस इलेक्ट्रॉनिक व्यापार व्यासपीठ उपलब्ध करुन पारंपारिक जलकृषीमध्ये क्रांती घडवेल. ते पुढे म्हणाले, ई-सांता एकत्रितपणे उत्पादने खरेदी करणार्‍या मच्छीमार आणि मत्स्यव्यवसाय संघटनांना एकत्र आणण्याचे माध्यम बनू शकते आणि यामुळे भारत आणि जगभऱातील लोकांना काय उपलब्ध आहे हे जाणून घेण्यास मदत होऊ शकते. हे भविष्यात लिलाव मंच देखील बनू शकेल. हे व्यासपीठ बर्‍याच भाषांमध्ये उपलब्ध आहे, जे स्थानिक लोकांना मदत करेल.

मच्छीमार आणि देश-विदेशात खरेदीदार यांच्यातील पूल बनेल

पारंपारिक मत्स्यपालन विषयक आव्हानांचा संदर्भ देताना गोयल म्हणाले की, शेतकर्‍यांना मक्तेदारी व शोषणाचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर निर्यातदारांना खरेदी केलेल्या उत्पादनांमध्ये विसंगती व गुणवत्तेच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ट्रेसिबिलिटी ही मोठी समस्या आहे. ते पुढे म्हणाले की, ई-सांता वेबसाइट (https://esanta.gov.in) मच्छीमारांच्या जीवनमानात बदल घडवून आणेल, त्यांच्या जीवनात व्यापक सुधारणा घडवून आणेल आणि त्याचबरोबर जागतिक व्यापारात भारताची प्रतिष्ठा वाढवेल. हे पोर्टल देश-विदेशातील मच्छिमार आणि खरेदीदार यांच्यात पूल म्हणून काम करेल. गोयल यांनी हे भारताच्या आत्मनिर्भर भारत मिशनच्या मुकुटात आणखी पंख रोवले गेले. ते म्हणाले की यामुळे भारताला स्वावलंबी होण्यास मदत होईल. गोयल पुढे म्हणाले की, आमचे सरकार शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. ते म्हणाले की एनएसीएसएच्या पुढाकाराने भारतातील जलचर उत्पादनांच्या विपणनाचा नकाशा बदलण्याची क्षमता आहे.

पेपरलेस इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म ई-सांताद्वारे मिळतील या सुविधा

ई-सांता हा एक शेतकरी आणि निर्यातदार यांच्यातील पूर्णपणे पेपरलेस आणि एंड-टू-एंड इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. यावर, शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांची यादी करण्याचे आणि किंमती ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे. दुसरीकडे, निर्यातकांना त्यांची आवश्यकता सूचीबद्ध करणे आणि इच्छित आकार, स्थान आणि पिक कापणीची तारीख इत्यादी आवश्यकतेनुसार उत्पादने निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. हे शेतकरी आणि खरेदीदारांना व्यापारावर अधिक नियंत्रण ठेवण्यास आणि माहितीवर आधारीत निर्णय घेण्यास सक्षम करते. हे व्यासपीठ प्रत्येक उत्पादनांच्या कॅटलॉगचे तपशीलवार वर्णन प्रदान करते. त्याच वेळी जेव्हा पीक यादी आणि ऑनलाइन वाटाघाटीनंतर सौदा निश्चित केला जातो तेव्हा आगाऊ पैसे दिले जातात आणि अंदाजित चलन केले जाते.

यानंतर, कापणीची तारीख निश्चित झाल्यावर, खरेदीदार शेतात जाऊन त्याच्या उपस्थितीत पिकाची कापणी करतो. त्याच वेळी, पीक पूर्ण झाल्यानंतर अंतिम गणना, साहित्याचे प्रमाण, अंतिम रक्कम ठरविली जाते आणि वितरण चलन जारी केले जाते. यानंतर, एकदा मटेरियल प्रोसेसिंग प्लांट पोहोचल्यानंतर अंतिम चलन बनविला जातो आणि निर्यातक उर्वरीत रक्कम भरतो. हे पेमेंट एस्क्रो खात्यात दिसून येते. एनएसीएसए याची खातरजमा करतो व त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे वाटप करतो. (E-Santa will increase farmers income, know about e-Santa and its benefits)

इतर बातम्या

CBSE 10th Exam 2021 Cancelled: सोनू सूद विद्यार्थ्यांच्या पाठिशी राहिला, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर म्हणाला…

कुठल्या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा, टॉप 10 मध्ये भारत कितव्या स्थानी?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.