AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत मोठा गोंधळ, काय आहे ‘हेअरकट’? शेतकऱ्यांना बसणार फटका? कृषिमंत्र्यांनी काय दिले उत्तर?

punyashlok ahilyadevi holkar farmer loan waiver scheme: शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीदरम्यान एक मोठी अडचण समोर आली आहे. बँका हेअरकट अडून शेतकऱ्यांना नडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे याविषयीची तक्रार केली. काय आहे हेअरकट? काय दिले कृषिमंत्र्यांनी उत्तर?

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत मोठा गोंधळ, काय आहे 'हेअरकट'? शेतकऱ्यांना बसणार फटका? कृषिमंत्र्यांनी काय दिले उत्तर?
हेअरकट वरून मोठा गोंधळ
| Updated on: Jul 30, 2026 | 1:18 PM
Share

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 553 पात्र शेतकऱ्यांची यादी 22 जुलै जाहीर करण्यात आली. तर आता दुसऱ्या टप्प्यात 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात ही यादी प्रसिद्ध होईल. पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. महाआयटी पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. तर बँका हेअरकट अडून शेतकऱ्यांना नडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

‘हेअरकट’ म्हणजे काय?

शेतकऱ्यांचे बँकेत कर्ज खाते असते. त्यात एक रक्कम असते आणि कर्जमाफीची जी यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यातील रक्कम यांच्यात तफावत दिसत आहे. त्यालाच हेअरकट म्हणतात. खरंतर याच्याशी शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार आणि बँका यांच्यातील आर्थिक तडजोडीची ही प्रक्रिया आहे. थकीत कर्जाचा किती वाटा सरकार उचलेल तर बँका किती हिस्सा उचलतील याविषयीची आर्थिक तडजोड निश्चित करण्यात येते. त्याचा सरकारच्या मूळ कर्जमाफी रक्कमेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पण काही बँका त्यावर खुटून बसल्याचे दिसते. त्याविरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर कृषिमंत्र्यांनी चिंता न करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार आणि बँका यांच्यामधील करारानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण होण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शासन आणि बँकांमधील हेअरकट सूत्र

1 वर्षांपर्यंत थकीत कर्ज असल्यास सरकार 85 टक्के तर बँका 15 टक्के वाटा उचलते

2 वर्षांपर्यंत थकीत कर्ज असल्यास सरकार 70 टक्के आणि बँका 30 टक्के

3 वर्षांपर्यंत थकीत कर्जावर सरकार 55 टक्के तर बँक 45 टक्के

4 वर्षांपर्यंतच्या थकीत कर्जातील सरकारी वाटा 45 टक्के तर बँकांवरील बोजा 55 टक्के

आता या पेक्षा अधिक काळ कर्ज थकीत असल्यास सरकार 35 टक्के तर बँकेचा वाटा 65 टक्के इतका असतो

शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

साधारणत: 16 लाख 96 हजार खात्यांना कर्जमाफीसंदर्भातील दुसरी यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांना आपण विशिष्ट क्रमांकही दिलेला आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. तर कर्जमाफीविषयीची जी कागदपत्रे सांगण्यात आलेली आहे, त्याची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असेल. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड झाल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे.

कर्जमाफीतील ठळक मुद्दे

56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

योजनेसाठी 36 हजार 585 कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद

यापूर्वी कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 2 लाख रुपयांची मदत

Follow Us
भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...
मोठी बातमी! भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...अभिजीत दीपकेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून...
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून... एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट अमित शाहांचं नाव घेत हल्ला
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
Sanjay Raut Uncut | हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र ठरेल; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांचा आरोप
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ
कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप
मोठी बातमी! कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण.... बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील..
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी