AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना दिलासा : नविन तुरीला मिळणार योग्य दर, मात्र, संवर्धनाची घ्यावी लागणार काळजी

खरिपातील तूर अजूनही वावरातच आहे. मात्र, शेतातील तूर बाजारात येण्यापूर्वीच दराबाबत चर्चा होऊ लागली आहे. कारण खरिपातील कापूस वगळता एकाही शेतीमालाला योग्य दर मिळालेला नाही. ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे सोयाबीनप्रमाणेच तुरीचेही होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून तुरीचे दर हे स्थिर राहिलेले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा : नविन तुरीला मिळणार योग्य दर, मात्र, संवर्धनाची घ्यावी लागणार काळजी
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 2:12 PM
Share

लातूर : खरिपातील तूर अजूनही वावरातच आहे. मात्र, शेतातील तूर बाजारात येण्यापूर्वीच दराबाबत चर्चा होऊ लागली आहे. कारण खरिपातील कापूस वगळता एकाही शेतीमालाला योग्य दर मिळालेला नाही. ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे सोयाबीनप्रमाणेच तुरीचेही होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून तुरीचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. तुरीला सरासरी 5400 ते 5600 चा दर मिळत आहे. शिवाय साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही आता खरेदीसाठी मोकळीकता मिळालेली आहे. त्यामुळे भविष्यात तुरीचे दर हे स्थिर राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

खरिपातील शेतमालाच्या दरात कायम चढःउतार हे पाहवयास मिळालेले आहेत. सोयाबीनचे दर मात्र, कायम घटलेले होते तर कापसाच्या दरात कायम सुधारणा झालेली आहे. आता तुरीचे काय होणार असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला आहे. मात्र, पावसामुळे तुरीचे नुकसान आणि फायदा अशा दोन्हीही बाबी घडलेल्या आहेत. मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी तर तुरीचा शेतामध्येच खराटा झाला. पण अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात तुर ही बहरली असून काही भागात किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र, दर स्थिर राहिल्याने भविष्यात दर वाढतील अशी आशा आहे.

असे करा व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट

मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. * फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आयात तुरीचे दर स्थिरावले

देशातील बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून तुरीचे दर हे स्थिर आहेत. एवढेच नाही तर सरकारने आयात केलेल्या तुरीचे दरही स्थिरच आहेत. मध्यंतरी कडधान्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुरीचीही मोठ्या प्रमाणात आयात केली होती. इतर देशातून तब्बल अडीच लाख टन तुर आयात केली जाणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, दिवाळीनंतर तुरीचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. त्यामुळे आवक नुसार भविष्यातही तुरीला भाव मिळणार आहे.

पुढील महिन्यापासून वाढणार आवक

तुर हे खरिपातील शेवटचे पिक आहे. सध्या तुर ही फुलोऱ्यात असून एक ते दीड महिन्यात नविन तुर ही बाजारात दाखल होणार आहे. शिवाय आता पावसाने उघडीप दिली असल्याने धोका नाही मात्र, वातावरण बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे. तुरीला 5500 ते 6900 पर्यंतचा दर मिळत आहे. दिवाळीत दरांमध्ये काहीशी वाढ झाल्यानंतर आता दर स्थिरावले आहेत. सध्या बाजारपेठेत गेल्या हंगामातील आणि आयात केलेल्या तुरीचा व्यापार होत आहे.

संबंधित बातम्या :

कामगंध सापळ्यातून कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे? व्यवस्थापनात सापळ्यांची भूमिका काय?

नुकसानभरपाई मिळण्यास आणेवारीचा अडसर, कशी ठरवली जाते आणेवारी ?

बळीराजा जागा हो : आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्ती नाही, उरले फक्त चार दिवस

https://www.youtube.com/c/TV9MarathiLive/videos

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.