AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचे प्रश्न आता एका फोनवर लागणार मार्गी, कोणत्या राज्यात सुरु झाला अनोखा उपक्रम?

राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांसाठी एक किसान कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी फोन करु शकतात. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत शेतकऱ्यांना कॉल सेंटर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट फोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क साधता येणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न आता एका फोनवर लागणार मार्गी, कोणत्या राज्यात सुरु झाला अनोखा उपक्रम?
पीएम किसान सन्मान योजनेसाठीची नोंदणी आता मोबाईलद्वारेही करता येणार आहे.
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 3:13 PM
Share

मुंबई : केवळ मार्गदर्शन मिळत नसल्याने शेती व्यवसयातून योग्य ते उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हीच स्थिती शेतकऱ्यांची आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न हे एका फोनवर सुटले तर..! वाटले ना आश्चर्य पण खरंच ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर काय होईल? आता ही केवळ एक कल्पनाच राहिली नाहीतर (Jharkhand Government) झारखंड सरकारने हे प्रत्यक्षात उतरवले आहे. राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांसाठी एक किसान (Call Center) कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी फोन करु शकतात. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत शेतकऱ्यांना कॉल सेंटर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट फोन वापरणाऱ्या (Farmer) शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क साधता येणार आहे.

एवढेच नाही तर वेबसाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही मदत केली जाणार आहे. झारखंडचे कृषी, पशुसंवर्धन आणि सहकार मंत्री बादल यांनी बुधवारी किसान कॉल सेंटरसुरू केले.रांचीयेथे त्याचे औपचारिक उद्घाटन केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता केवळ एक फोन आणि एक क्लिक एवढेच करावे लागणार असल्याचे बादल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडे तीन मार्ग

शेती करीत असताना येणाऱ्या समस्यांवर तोडगा निघाला तरच शेतकरी पुढे जाऊ शकणार आहे. त्यामुळे झारखंड येथील शेतकऱ्यांना 1800-123-1136 या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा लागणार आहे. व्हॉट्सअॅप नंबर 8797891222 देखील वापरता येईल. वेबसाइट kccjharkhand.in आपल्याला आपल्या समस्या, समस्या ठेवण्यास सक्षम करेल. अशा प्रकारे शेतकऱ्यांना फोन कॉल, ऑनलाइन पोर्टल आणि एसएमएसद्वारे ही मोफत माहिती आणि उपायही मिळवू शकणार आहेत. शेतीमध्ये वापरली जाणारी नवीन तंत्रे आणि इतर माहितीही येथून उपलब्ध होणार आहे.

आत्याधुनिक प्रणालीचा होईल फायदा

सध्या सबंध जगभर मोबाईचा वापर वाढत आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने त्याचा योग्य वापर होणेही गरजेचे आहे. हाच प्रयोग झारखंड सरकार राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या दरम्यान महत्वाचे असते ते योग्य मार्गदर्शन. आणि याच समस्येवर झारखंड सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पध्ततीने प्रयोग राबवणारे हे कदाचित पहिलेच राज्य आहे. ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना बांधावर असतानाही घेता येणार आहे. हे झारखंड सरकारला शक्य झाले मग महाराष्ट्रात का नाही हा मुद्दाही महत्वाचा आहे. मात्र, या अनोख्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीनचे दरात घट होताच पुन्हा शेतकऱ्यांची तीच ‘खेळी’ पण, यावेळी येणार कामी, काय आहे बाजारपेठतले वास्तव?

Banana Farming: आवक घटली मागणी वाढली, अखेर केळीच्या दरात सुधारणा झाली

Sugarcane Crop: अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडले पण क्षेत्र मोजायचे कसे? जानेवारी अखेरीस अहवालातून चित्र स्पष्ट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.