कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे म्हणून. याकरिता एक महिन्याचा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे. आता कर्जमुक्ती होणार म्हणल्यावर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हे आधार प्रमाणीकरण करण्याची घाईगडबड सुरु झाली आहे. पण आधार प्रमाणीकरण करायचे म्हणजे काय ? याची माहिती आपण घेणार आहोत..

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 10:53 AM

लातूर : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती यादीत (Debt relief list) नाव असूनही अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेली आहेत. आता गेल्या काही दिवसांपासून या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अवाहन केले जात आहे की, त्या संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे म्हणून. (Aadhaar Card Authentication) याकरिता एक महिन्याचा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे. आता कर्जमुक्ती होणार म्हणल्यावर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हे आधार प्रमाणीकरण करण्याची घाईगडबड सुरु झाली आहे. पण आधार प्रमाणीकरण करायचे म्हणजे काय ? याची माहिती आपण घेणार आहोत..

शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2021 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सुरु करण्यात आली होती. मात्र, कधी राज्य सरकारकडे पैशाचा तुटवडा असल्याने शेतकरी हे वंचित राहिले होते तर आता शेतकऱ्यांनी आधार हे प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहेत. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण केले तरच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही त्यांनी वेळेत ही प्रक्रीया पूर्ण करणे महत्वाचे आहे.

काय आहे आधार प्रमाणीकरण?

* कोणत्याही शासकीय कामामध्ये आधार कार्ड हे आता आवश्यकच झाले आहे. आता कर्जमुक्तीसाठीही हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक झाले आहे. प्रमाणीकरण म्हणजे थोडक्यात आपले आधार अपडेट करणे हा त्याचा अर्थ आहे. * अनेकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असूनही त्याची दुरुस्ती ही केली जात नाही. त्याची आवश्यकताही वाटत नाही. पण जर तुमचे नाव कर्जमुक्ती यादीत आले आहे पण कर्जमुक्ती झाली नाही तर तुम्हाला ही प्रक्रीया करावीच लागणार आहे. * आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला आधार केंद्रावर जावे लागणार आहे. आधार कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील त्या निदर्शनात आणून द्याव्या लागणार आहेत. यामध्य बदह करण्यासाठी तुमच्याकडे त्या बदलासंदर्भातले प्रूफ असणे आवश्यक आहे. याकरिता मतदान कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जवळ असणे आवश्यक आहे. * यापुर्वी आधार कार्डवर केवळ संबंधित व्यक्तीचे जन्माचे वर्षाचा उल्लेख केला जात होता. पण आता तारीख, महिना यासह उल्लेख अनिवार्य झाला आहे. अशा दुरुस्त्या शेतकऱ्यांनी करुन घ्यायला हव्यात. * प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल क्रमांक, जन्माचा दाखला, पॅन ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. * या प्रमाणीकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा बॅंकेमध्येही हे बदल करुन घेता येतात.

महिन्याभराची मोहीम

आधार कार्ड हे प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाने कालावधी हा ठरवून दिलेला आहे. 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांना हे प्रमाणीकरण करायचे आहे. यामुळे कारभरात नियमितता येणार आहे. याकरिता गावागावाद जनजागृती केली जात असून ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केले नाही त्यांची यादी ही ग्रामपंचायत, शाळेचा परिसर या ठिकाणी लटकवली जाणार आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी प्रमाणीकरण आवश्यक आहे आणि शेवटची संधी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Farmers to get debt relief benefits only if Aadhaar authentication is done, important news for farmers)

संबंधित बातम्या :

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

दुष्काळात तेरावा : रब्बीच्या तोंडावर वाढले खतांचे दर, शेतकरी दुहेरी संकटात

शेतात जाण्यास रस्ताच नाही ? मग असा करा अर्ज अन् मिळवा हक्काचा रस्ता

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.