AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे म्हणून. याकरिता एक महिन्याचा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे. आता कर्जमुक्ती होणार म्हणल्यावर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हे आधार प्रमाणीकरण करण्याची घाईगडबड सुरु झाली आहे. पण आधार प्रमाणीकरण करायचे म्हणजे काय ? याची माहिती आपण घेणार आहोत..

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 23, 2021 | 10:53 AM
Share

लातूर : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती यादीत (Debt relief list) नाव असूनही अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेली आहेत. आता गेल्या काही दिवसांपासून या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अवाहन केले जात आहे की, त्या संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे म्हणून. (Aadhaar Card Authentication) याकरिता एक महिन्याचा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे. आता कर्जमुक्ती होणार म्हणल्यावर ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हे आधार प्रमाणीकरण करण्याची घाईगडबड सुरु झाली आहे. पण आधार प्रमाणीकरण करायचे म्हणजे काय ? याची माहिती आपण घेणार आहोत..

शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2021 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सुरु करण्यात आली होती. मात्र, कधी राज्य सरकारकडे पैशाचा तुटवडा असल्याने शेतकरी हे वंचित राहिले होते तर आता शेतकऱ्यांनी आधार हे प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहेत. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण केले तरच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही त्यांनी वेळेत ही प्रक्रीया पूर्ण करणे महत्वाचे आहे.

काय आहे आधार प्रमाणीकरण?

* कोणत्याही शासकीय कामामध्ये आधार कार्ड हे आता आवश्यकच झाले आहे. आता कर्जमुक्तीसाठीही हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक झाले आहे. प्रमाणीकरण म्हणजे थोडक्यात आपले आधार अपडेट करणे हा त्याचा अर्थ आहे. * अनेकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असूनही त्याची दुरुस्ती ही केली जात नाही. त्याची आवश्यकताही वाटत नाही. पण जर तुमचे नाव कर्जमुक्ती यादीत आले आहे पण कर्जमुक्ती झाली नाही तर तुम्हाला ही प्रक्रीया करावीच लागणार आहे. * आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला आधार केंद्रावर जावे लागणार आहे. आधार कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील त्या निदर्शनात आणून द्याव्या लागणार आहेत. यामध्य बदह करण्यासाठी तुमच्याकडे त्या बदलासंदर्भातले प्रूफ असणे आवश्यक आहे. याकरिता मतदान कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जवळ असणे आवश्यक आहे. * यापुर्वी आधार कार्डवर केवळ संबंधित व्यक्तीचे जन्माचे वर्षाचा उल्लेख केला जात होता. पण आता तारीख, महिना यासह उल्लेख अनिवार्य झाला आहे. अशा दुरुस्त्या शेतकऱ्यांनी करुन घ्यायला हव्यात. * प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल क्रमांक, जन्माचा दाखला, पॅन ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. * या प्रमाणीकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा बॅंकेमध्येही हे बदल करुन घेता येतात.

महिन्याभराची मोहीम

आधार कार्ड हे प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाने कालावधी हा ठरवून दिलेला आहे. 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांना हे प्रमाणीकरण करायचे आहे. यामुळे कारभरात नियमितता येणार आहे. याकरिता गावागावाद जनजागृती केली जात असून ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केले नाही त्यांची यादी ही ग्रामपंचायत, शाळेचा परिसर या ठिकाणी लटकवली जाणार आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी प्रमाणीकरण आवश्यक आहे आणि शेवटची संधी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Farmers to get debt relief benefits only if Aadhaar authentication is done, important news for farmers)

संबंधित बातम्या :

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

दुष्काळात तेरावा : रब्बीच्या तोंडावर वाढले खतांचे दर, शेतकरी दुहेरी संकटात

शेतात जाण्यास रस्ताच नाही ? मग असा करा अर्ज अन् मिळवा हक्काचा रस्ता

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत