AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन सरकार PM Kisan बंद करणार? मग नीती आयोग का घेत आहे योजनेचा आढावा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. नवीन सरकार आल्यानंतर ही योजना गुंडाळण्यात येणार आहे का? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कारण नीती आयोगाने योजनेचे मूल्यांकन सुरु केले आहे.

नवीन सरकार PM Kisan बंद करणार? मग नीती आयोग का घेत आहे योजनेचा आढावा
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.
| Updated on: May 23, 2024 | 9:58 AM
Share

लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात आहे. 4 जून रोजी निकाल समोर येतील. त्यानंतर नवीन सरकार येईल. पीएम किसान योजनेविषयी नवीन सरकार काय धोरण राबविते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही योजना फेब्रुवारी 2029 मध्ये त्यावेळेच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरु करण्यात आली होती. तिला आता पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. या योजनेची केंद्रीय नीती आयोग समीक्षा करत आहे.

100 दिवसांचा अजेंडा

देशात नवीन सरकारी जून महिन्याच्या अखेरीस येईल. पंतप्रधान शपथ घेतील. तर केंद्रीय कॅबिनेट पण जाहीर होईल. त्यानंतर नवीन सरकार 100 दिवसांचा अजेंडा, धोरण हाती घेईल. पुढील पाच वर्षांसाठी काय करावे लागणार यासाठी या 100 दिवसांत आराखडा तयार करण्यात येईल.

पीएम किसानबाबत काय निर्णय?

  1. 100 दिवसांत पुढील धोरण ठरविताना अनेक योजनांची समीक्षा समोर असेल. सध्या पीएम किसान योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत वर्षाला तीन टप्प्यात, तीन हप्त्यात केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांची आर्थिक मदत करत आहे. वर्षाला एकूण 6 हजार रुपये मदत करण्यात येते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो.
  2. लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी या योजनेचा हप्ता वाढण्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. पण अंतरिम बजेटमध्ये त्याविषयीची कुठलीची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत नाराजी होती. शेतकऱ्यांना सध्या कृषी अवजारे, खतांसह इतर अनेक वस्तू खरेदीसाठी जीएसटी द्यावा लागत आहे. त्यावरुन शेतकरी सरकारवर नाराज आहे. सरकार एका हाताने देते. तर दुसऱ्या हाताने काढून घेत असल्याची प्रबळ भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. MSP चा मुद्या पण शेतकऱ्यांना सतावत आहे.
  3. अशातच आता पीएम किसान योजनेला 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा आढावा घेण्यात येत आहे. केंद्रीय नीती आयोग या योजनेची फलश्रुती तपासत आहे. या योजनेने उद्दिष्ट्य साध्य केले की नाही. या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला. या योजनेत लाभ देताना काही गडबड झाली का? योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहचला की नाही, हे आयोग तपासणार आहे. त्याआधारे काही सूचना आणि सल्ला देण्यात येईल. ही योजना बंद होणार की नाही हे अजून स्पष्ट नसले तरी या योजनेत अमुलाग्र बदल होईल हे मात्र नक्की.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?