AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna : सरकारची आत्महत्यामुक्तीची घोषणा, मराठवाड्यात मात्र आत्महत्या सत्र सुरुच, जालन्यात शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. वडी काळ्या गावातील शेतकरी दाम्पत्याकडेही फायनान्स आणि बचत गटाचे कर्ज होते. शिवाय फायनान्सचा व्याजदरही अधिक असल्याने कर्जाची रक्कम ही दिवसेंदिवस वाढत होती तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची शाश्वती नाही. त्यामुळे या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Jalna : सरकारची आत्महत्यामुक्तीची घोषणा, मराठवाड्यात मात्र आत्महत्या सत्र सुरुच, जालन्यात शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन
वाढत्या कर्जाला त्रासून जालन्यातील शेकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
| Edited By: | Updated on: Aug 27, 2022 | 8:15 PM
Share

जालना :  (State Government) शिंदे सरकारची स्थापना होताच महाराष्ट्र हे (Farmer suicides) शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य असणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, राज्यात आत्महत्येचे सत्र हे सुरुच आहे. विशेष म्हणजे कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही अधिक आहे. मराठवाड्यात नांदेडपाठोपाठ शनिवारी जालन्यात आत्महत्याची घटना घडली आहे. (Debt on farmers ) कर्जबाजारीपणाला कंटाळून अंबड तालुक्यातील वडी काळ्या गावातील पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या दाम्पत्याकडे फायनान्स आणि बचत गटाचे कर्ज होते. सध्याची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर याला त्रासून या दांम्पत्याने हा टोकाचा निर्णय घेतला. वडी काळ्या गावातील या शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपवले आहे.

पती-पत्नीची आत्महत्या

वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. वडी काळ्या गावातील शेतकरी दाम्पत्याकडेही फायनान्स आणि बचत गटाचे कर्ज होते. शिवाय फायनान्सचा व्याजदरही अधिक असल्याने कर्जाची रक्कम ही दिवसेंदिवस वाढत होती तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची शाश्वती नाही. त्यामुळे या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. राहत्या घरी शनिवारी सकाळी गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले आहे. एकाच वेळी दोघांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कर्जाचा वाढता डोंगर

पीक पद्धतीमध्ये बदल आणि उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीकोनातून शेतकरी कर्ज घेऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा उद्देश साध्य होईलच असे नाही. गतवर्षी परतीच्या पावसाने नुकसान झाले होते तर यंदा हंगामाच्या सुरवातीलाच अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत असल्याने वडी काळ्या गावातील शेतकरी दाम्पत्याने हा टोकाचा निर्णय घेतला होता.

पोलिसांत मात्र आकस्मात मृत्यूची नोंद

अंबड तालुक्यातील वडी काळ्या या गावातील पती पत्नीने राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या शेतकरी दाम्पत्याकडे फायनान्ससह वेगवेगळ्या बचत गटाचेही कर्ज होते. मात्र, घेतलेले कर्ज फेडायचे कसे यामधून त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात मात्र, आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.