AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीने फेरले स्वप्नांवर पाणी… कशी करावी लेकीची पाठवणी?

पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आपल्या मुलीचे कन्यादान सुध्दा करता आलेले नाही. ही अतिशोक्ती वाटेल पण हा प्रकार घडला आहे. (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील विहममांडवा येथे. घरात आठराविश्व दारिद्र त्यात अतिवृष्टीचा अवकृपा त्यामुळे सर्वकाही मातीमोल झालं आहे. त्यामुळे मुलाीचे लग्न करण्यासाठीही त्यांच्या काही उरलेले नाही. या नैसर्गिक संकटामुळे मुलीची पाठवणी तरी करावी कशी असा प्रश्न त्या शेतकऱ्यासमोर होता.

अतिवृष्टीने फेरले स्वप्नांवर पाणी... कशी करावी लेकीची पाठवणी?
संग्रहीच छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 20, 2021 | 6:31 PM
Share

औरंगाबाद : आतापर्यंत अतिवृष्टीने पीकाचे, शेतीचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले होते पण या पावसामुळे कुणाचा संसार थाटायचा थांबेल असे कुणालाही वाटले नसेल पण हे झाले आहे. (Heavy Rain) पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आपल्या मुलीचे कन्यादान सुध्दा करता आलेले नाही. ही अतिशोक्ती वाटेल पण हा प्रकार घडला आहे. (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील विहममांडवा येथे. घरात आठराविश्व दारिद्र त्यात अतिवृष्टीचा अवकृपा त्यामुळे सर्वकाही मातीमोल झालं आहे. त्यामुळे मुलाीचे लग्न करण्यासाठीही त्यांच्या काही उरलेले नाही. या नैसर्गिक संकटामुळे मुलीची पाठवणी तरी करावी कशी असा प्रश्न त्या शेतकऱ्यासमोर होता. त्यामुळे लग्नसमारंभच नंतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सर्वकाही रितीरिवाजाप्रमाणे ठरले होते. लग्नाची तारीख जवळ येताच अतिवृष्टीने हाहाकार केला आणि खरीपातील पीके ही उध्वस्त झाली त्यामुळे लग्नाचा खर्च तरी करावा कसा असा प्रश्न त्या अत्पभुधारक शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता.

निसर्गाची अवकृपा काय असते याचा प्रत्यय औरंगाबाद जिल्ह्यातील विहामंडळ सर्कलमधील गब्दुद वस्ती येथे आला आहे. येथील शेतकरी विश्वास गब्दुद यांच्या मुलीचे लग्न जमले होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोट्याखानीच लग्नसमारंभ करायचेही ठरले होते. मात्र, ज्या खरीपातील पीकाच्या उत्पादनावर लग्नसोहळ्याची स्वप्न रंगवली जात होती तीच पीकं एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. पावसाने सर्वकाही हिरावून घेतले होते. साध्या पध्दतीनेही लग्न करण्याची आता स्थिती राहिली नसल्याचे शेतकरी विश्वास यांनी पीटीआय ला सांगितले आहे.

त्यामुळे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे एखाद्याचा संसारही थाटला गेला नाही. या वस्तीवरच्या नागरिकांनी अगदी साध्या पध्दतीने लग्नसोहळा उरकण्याचा सल्लाही दिला मात्र, आवश्यक असलेला माल खरेदीसाठी पैसे नसल्याचे विश्वास यांनी सांगितले आहे. पावसामुळे लग्नाचा मुहुर्त तर आता टळला आहे. निसर्गाचा प्रकोप झाल्यावर याचा कशावर काही परिणाम होईल हे सांगता येत नाही.

हातातोंडाशी आलेला घास हिसकावला

खरीप हंगामातील काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली होती. याच उत्पादनातून विश्वास यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्याचे ठरवले होते. पण गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिले. अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद पीकाचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. काढणीही मुश्किल झाली होती. या नुकसानीमुळे पैसेच नसल्याने अखेर लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे विश्वास यांनी सांगितले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतामध्ये जागोजागी पाणी साचलेले आहे. शेतामध्ये जाणेही मुश्किल झाले आहे. खरीप हातचा गेला असून सध्याही पाणी हे साचलेलेच आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या आशाही धूसर झालेल्या आहेत.

चांगल्या उत्पादनाची होती आशा

हंगामाच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने खरीपातील पीके ही जोमात होती. मध्यंतरी पावसाने ओढ दिली मात्र, त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने पीके बहरत होती. या पीकाच्या उत्पादनावरच मुलीचे लग्न करायचा निर्णय विश्वास यांनी घेतला होता. पण अतिवृष्टीने सर्वकाही मातीमोल झाले. अन्यथा यंदा विक्रमी उत्पादन होण्याचा विश्वास य़ेथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता.

पीकेच नाहीतर शेतीही खरडून गेली

विहामंडवा हे औरंगाबादपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. दुष्काळी भाग म्हणून याची ओळख आहे. पण यंदा येथे सरासरीच्या 241.9 टक्के पाऊस पडला. महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, या पावसाळ्यात 564.6 मिमी च्या तुलनेत 1365.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोयाबीन, कापूससारख्या पिकांच्या चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु गेल्या महिन्यात पीक जवळजवळ कापणीस तयार असताना मुसळधार पाऊस पडला. शेतकरी विश्वास यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील सुमारे दोन ते तीन इंच वरच्या मातीचा थर वाहून गेला आहे. त्यामुळे पीकाचे तर नुकसान झालेच आहे पण पुढील हंगामातील पिक घेण्यासाठी जमिनच शिल्लक राहिलेली नाही.

सर्वकाही ठप्प, आता फक्त जगण्याची आशा

एखाद्या नैसर्गिक संकटामुळे कुटुंब कसे उध्वस्त होते हे विश्वास यांच्या बाबतीत झाले आहे. लग्नसमारंभ अगदी साध्या पध्दतीने करु असे त्यांना वस्तीवरच्या ग्रामस्थांनी सांगितले होते. पण आवश्यक साहित्य आणि कपडे खरेदी या बाबी तर सोडाच पण या खरेदीला जाण्यासाठी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठीही पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हालाकीची परस्थिती आणि त्यात नैसर्गिक संकट यामुळे लग्न लांबणीवर टाकण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावलेली आहे. अधिकच्या पावसामुळे या मंडळातील सर्व पीके ही मातीमोल झाल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. (Heavy rains affect wedding ceremony, farmer’s daughter not married in Aurangabad)

इतर बातम्या :

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

VIDEO: दबाव झुगारून बेकायदा बांधकामे पाडा, मी तुमच्या पाठीशी आहे; मुख्यमंत्र्यांच्या पालिकेला कडक सूचना

Aryan Khan : आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव, विशेष NDPS कोर्टाच्या निर्णयाला आव्हान, दिलासा मिळणार?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा