AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तयारी रब्बीची : खतांची खरेदी करताय, मग ‘अशी’ घ्या काळजी

खत कोणते याची माहितीच शेतकऱ्यांना नसल्याने उत्पादनात घट किंवा बियाणे उगवलेच नाही अशा तक्रारी ह्या वाढत आहेत. सध्याही रब्बीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य खताची निवड न केल्यास उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे खत घेताना कोणत्या बाबींचा विचार करायचा याची माहिती आज आपण घेणार आहोत..

तयारी रब्बीची : खतांची खरेदी करताय, मग 'अशी' घ्या काळजी
रासायनिक खत
| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 5:18 PM
Share

लातूर : हंगाम रब्बीचा असो की खरीपाचा रासायिनक (chemical fertilizer) खताशिवाय उत्पादनात वाढ नाही ही भावना शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करण्यापूर्वी खताची उपलब्धता आहे की नाही याची चौकशी केली जाते. काळाच्या ओघात अनेक वेगवेळ्या प्रकारची खते ही बाजारात दाखल झालेली आहेत. शेतकरीही विक्रेत्याच्या सल्ल्यानुसारच खरेदी करतात. मात्र, आता गावागवात (krishi seva kendra ) कृषी केंद्र ही थाटण्यात आलेली आहेत. यामध्ये चांगले खत कोणते याची माहितीच शेतकऱ्यांना नसल्याने उत्पादनात घट किंवा बियाणे उगवलेच नाही अशा तक्रारी ह्या वाढत आहेत. सध्याही रब्बीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य खताची निवड न केल्यास उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे खत घेताना कोणत्या बाबींचा विचार करायचा याची माहिती आज आपण घेणार आहोत..

बदलत्या काळाच्या ओघाच सेंद्रिय शेतीपध्दत ही नामशेष होत आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने रासायनिक खतांचा मारा वाढलेला आहे. असे असले तरी बोगस खत विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.

1) पीकानुसार कोणते खत घ्यावयाचे हे ठरवले जाते पण खताची खरेदी केली की विक्रेत्याकडून पक्की पावती घेणे हे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर वॅट नंबर त्या पावतीवर असणे आवश्यक आहे. जर भविष्यात खतामध्ये काही त्रुटी असल्यास त्याचा क्लेम शेतकरी हे ग्राहक मंचाकडे किंवा पंचाय़त समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे आपण क्लेम करुन नुकसानभरपाईची मागणी करु शकतो. मात्र, यासाठी पक्की पावती आणि त्या पावतीवर वॅट क्रमांक असणे आवश्यक असते.

2) खताच्या गोणीवर हिरवे, पिवळे, लाल असे उलटे त्रिकोण असतात. यामध्ये हिरव्या रंगाचा त्रिकोण हा कमी विषारी असतो तर पिवळा हा मध्यम आणि लाल रंगाचा त्रिकोण हा अधिक विषारी असतो. पीकानुसार त्याची निवड ही करावी लागते. या किटकनाशकाचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षित साधनांचा वापर करुन फवारणी करावी लागणार आहे.

3) शेतकऱ्यांनी शक्यतो सयुक्त खतांचा वापर करावा आणि त्याची मात्रा ही विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार देणे आवश्यक आहे. सयुक्त खत हे उपलब्ध नाहीत झाले तर स्वतंत्र खत घेऊन त्याचे मिश्रण करावे आणि फवारणी करणे फायद्याचे राहणार आहे.

4) पक्की पावती म्हणजे पक्के खत. त्यामुळे पावतीवरच समजते की खत पक्के आहे की, बोगस. शिवाय खताच्या पोत्यावर जे दर आहेत त्याच दरानुसार विक्री केली जाते की नाही याची चौकशी महत्वाची आहे. जर यामध्ये अनियमितता आढळून आल्यास कृषी अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्याची शिफारस आहे.

भरारी पथकांची नेमणूक

बोगस खत किंवा खतांचा साठा करणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक पथक नेमले जाते. तालुक्याची ठिकाणी या पथकातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्यामुळे खत विक्रेत्यांवर अंकूश राहतो व वेळेत शेतकऱ्यांना खत मिळते. (Rabi Season: Farmers should take care while buying fertilizers)

संबंधित बातम्या :

कृषी सल्ला : पावसाच्या उघडीपीचा ‘असा’ घ्या फायदा

‘टॅगिंग’च्या उपक्रमात राज्यातील 53 साखर कारखाने, थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल

हरभऱ्याला पोषक वातावरण, अनुदानही मिळणार प्रतिक्विंटल अडीच हजाराचे, असा घ्या लाभ

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.