AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : असा निसर्गाचा लहरीपणा, दोन तासांमध्ये तीन तालुक्यातील पिके उध्वस्त, नेमके काय झाले बीड जिल्ह्यात..!

वार्षिक सरासरीच्या तुलनेत बीडमध्ये तशी पावसाची अवकृपाच राहिली आहे. मात्र, सातत्य असल्याने पिके तरली होती. मात्र, रविवारी अवघ्या तीन तासांमध्येच 226 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वडवणी, माजलगाव आणि गेवराई शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांची कामे तर खोळंबली आहेतच पण आता पाणी साचून राहिल्यावर त्याचा परिणाम पीक वाढीवर होणार आहे.

Beed : असा निसर्गाचा लहरीपणा, दोन तासांमध्ये तीन तालुक्यातील पिके उध्वस्त, नेमके काय झाले बीड जिल्ह्यात..!
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 3:53 PM
Share

बीड : शेती व्यवसाय हा (Monsoon Rain) मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. पण हाच पाऊस यंदा नुकासनीलाही कारणीभूत ठरत आहे. आतापर्यंत राज्यात मुसळधार पाऊस बरसला असला तरी (Beed District) बीडमध्ये सरासरी एवढा पाऊस झाल्याने पिके जोमात होती. शिवाय वातावरणही पोषक होते. राज्यात पावसाने उसंत घेतली असताना मात्र, रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्यात अशी काय पावसाने हजेरी लावली आहे की सर्व (Crop Damage) पिके पाण्यात आहेत. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत असताना दोन तास झालेल्या या पावसाने तीनही तालुक्यातील पिके उध्वस्त केली आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच पण अनेक ठिकाणी शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत.

तीन तासांमध्ये 226 मिमी पावसाची नोंद

वार्षिक सरासरीच्या तुलनेत बीडमध्ये तशी पावसाची अवकृपाच राहिली आहे. मात्र, सातत्य असल्याने पिके तरली होती. मात्र, रविवारी अवघ्या दोन तासांमध्येच 226 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वडवणी, माजलगाव आणि गेवराई शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांची कामे तर खोळंबली आहेतच पण आता पाणी साचून राहिल्यावर त्याचा परिणाम पीक वाढीवर होणार आहे. आतापर्यंत खरिपातील पिकांवर कोणताच धोका नव्हता पण तीन तासामध्य सर्व चित्र बदलून गेले आहे. कापूस, सोयाबीन ही मुख्य देखील पाण्यात आहेत.

पावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप

अवघे तीन तास झालेल्या पावसामुळे चौहिकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होणार आहे. शिवाय शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडण्याचा धोका आहे. आतापर्यंत सर्वकाही पोषक होते मात्र, एका दिवसामध्ये खरिपाचे चित्र बदलून गेले आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्रावर पेरा झाला होता. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत असतानाच हे संकट समोर आले आहे. जागोजागी पाणा साचलेले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

गोगलगायीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त

गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच राहत असून उगवलेले जोपासावे कसे हाच मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात तब्बल 3 हजार 600 हेक्टरावरील पिकांचे नुकसान केवळ गोगलगायीमुळे झाले आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली असून शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी चर खोदण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. आतापर्यंत उत्पादनाचे स्वप्न पाहणारा शेतकरी आता पिके जोपासण्यासाठी धडपड करीत आहे.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.