AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : असा निसर्गाचा लहरीपणा, दोन तासांमध्ये तीन तालुक्यातील पिके उध्वस्त, नेमके काय झाले बीड जिल्ह्यात..!

वार्षिक सरासरीच्या तुलनेत बीडमध्ये तशी पावसाची अवकृपाच राहिली आहे. मात्र, सातत्य असल्याने पिके तरली होती. मात्र, रविवारी अवघ्या तीन तासांमध्येच 226 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वडवणी, माजलगाव आणि गेवराई शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांची कामे तर खोळंबली आहेतच पण आता पाणी साचून राहिल्यावर त्याचा परिणाम पीक वाढीवर होणार आहे.

Beed : असा निसर्गाचा लहरीपणा, दोन तासांमध्ये तीन तालुक्यातील पिके उध्वस्त, नेमके काय झाले बीड जिल्ह्यात..!
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 01, 2022 | 3:53 PM
Share

बीड : शेती व्यवसाय हा (Monsoon Rain) मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. पण हाच पाऊस यंदा नुकासनीलाही कारणीभूत ठरत आहे. आतापर्यंत राज्यात मुसळधार पाऊस बरसला असला तरी (Beed District) बीडमध्ये सरासरी एवढा पाऊस झाल्याने पिके जोमात होती. शिवाय वातावरणही पोषक होते. राज्यात पावसाने उसंत घेतली असताना मात्र, रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्यात अशी काय पावसाने हजेरी लावली आहे की सर्व (Crop Damage) पिके पाण्यात आहेत. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत असताना दोन तास झालेल्या या पावसाने तीनही तालुक्यातील पिके उध्वस्त केली आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच पण अनेक ठिकाणी शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत.

तीन तासांमध्ये 226 मिमी पावसाची नोंद

वार्षिक सरासरीच्या तुलनेत बीडमध्ये तशी पावसाची अवकृपाच राहिली आहे. मात्र, सातत्य असल्याने पिके तरली होती. मात्र, रविवारी अवघ्या दोन तासांमध्येच 226 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वडवणी, माजलगाव आणि गेवराई शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांची कामे तर खोळंबली आहेतच पण आता पाणी साचून राहिल्यावर त्याचा परिणाम पीक वाढीवर होणार आहे. आतापर्यंत खरिपातील पिकांवर कोणताच धोका नव्हता पण तीन तासामध्य सर्व चित्र बदलून गेले आहे. कापूस, सोयाबीन ही मुख्य देखील पाण्यात आहेत.

पावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप

अवघे तीन तास झालेल्या पावसामुळे चौहिकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होणार आहे. शिवाय शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडण्याचा धोका आहे. आतापर्यंत सर्वकाही पोषक होते मात्र, एका दिवसामध्ये खरिपाचे चित्र बदलून गेले आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्रावर पेरा झाला होता. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत असतानाच हे संकट समोर आले आहे. जागोजागी पाणा साचलेले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

गोगलगायीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त

गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच राहत असून उगवलेले जोपासावे कसे हाच मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात तब्बल 3 हजार 600 हेक्टरावरील पिकांचे नुकसान केवळ गोगलगायीमुळे झाले आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली असून शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी चर खोदण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. आतापर्यंत उत्पादनाचे स्वप्न पाहणारा शेतकरी आता पिके जोपासण्यासाठी धडपड करीत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...