AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, शेतकरी करणार का संधीच सोनं…!

सोयाबीनच्या दरात पुन्हा चढ-उतार सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता योग्य संधी साधून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर एवढ्या दिवस केलेल्या साठवणूकीचा फायदा होईल. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 200 वर स्थिरावले होते. गुढी पाडव्यानंतर पुन्हा सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी सुधारणा होऊ लागली आहे. बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 350 रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे.

Latur Market : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, शेतकरी करणार का संधीच सोनं...!
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 06, 2022 | 3:23 PM
Share

लातूर : (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात पुन्हा चढ-उतार सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता योग्य संधी साधून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर एवढ्या दिवस केलेल्या (Soybean Stock) साठवणूकीचा फायदा होईल. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 200 वर स्थिरावले होते. गुढी पाडव्यानंतर पुन्हा सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी सुधारणा होऊ लागली आहे. बुधवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 350 रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी साठवणूकच करणार की विक्रीचा निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. कारण उन्हाळी हंगामातील सोयाबीनही आता मार्केटमध्ये दाखल होईल शिवाय रशिया-युक्रेनचाही परिणाम कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात दर कमी झाले तर पुन्हा वाढतील का नाही याबाबत व्यापारीही संभ्रमात आहेत. त्यामुळे शेतकरी काय निर्णय घेणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे. सध्या लातुरात 25 हजार पोत्यांची आवक सुरु आहे.

सोयाबीन वाढले तुरीच्या दरात घट

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोयाबीन दिवसाकाठी 50 ते 100 रुपयांनी वाढत आहे. त्यामुळेच 7 हजार 200 वर आलेले सोयाबीन आता पुन्हा 7 हजार 350 वर य़ेऊन ठेपले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती त्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत तुरीची आयात ही सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम थेट तुरीच्या दरावर दिसून येत आहे. कारण चार दिवसांपूर्वीच तूर ही 6 हजार 500 रुपये क्विंटलवर होती. बुधवारी मात्र, चित्र बदलले होते. तुरीला 6 हजार 350 प्रमाणे दर मिळाला आहे. तुरीचे दर हमीभावा समानच झाले आहेत. सरकारच्या निर्णयाचाच फटका असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी काय निर्णय घेणार?

सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही दिवसांनी पुन्हा उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु होणार आहे. यंदा केवळ बियाणापुरते नाही तर उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला होता. हे सोयाबीन जोमात असून लवकरच याची आवक सुरु होणार आहे. त्यामुळे खरिपातील साठवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी आता विकले तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी अशोत अग्रवाल यांनी सांगितले आहे. आता दर वाढत आहेत म्हणून शेतकरी काय भूमिका घेणार हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

Fact Check : काय सांगता? Kisan Credit Card वर आकारले जाणार नाही व्याज..! सरकारची बाजू समजून घ्या अन् गैरसमज दूर करा

Latur : पाटबंधारे विभागाचा असा ‘हा’ निर्णय, भर उन्हाळ्यातही लातुरातील शेतकरी सुखावला

अतिरिक्त उसाची माहिती द्या, तरच होणार तोडीचे नियोजन, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसाठी विशेष मोहिम..!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली