AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या राज्यात जनावरांना 1 दिवस ‘वीक ऑफ’! 100 वर्षांची परंपरा

तुम्ही कधी प्राण्यांच्या साप्ताहीक अवकाशच्या बाबत काही ऐकलं आहे का ? या राज्यात प्राण्यांना सुट्टी देण्याची परंपरा मागच्या 100 वर्षांपासून सुरु आहे. जाणून घ्या याची सुरुवात कशी झाली.

या राज्यात जनावरांना 1 दिवस 'वीक ऑफ'! 100 वर्षांची परंपरा
animal viral storyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2023 | 3:39 PM
Share

मुंबई : कोणत्याही शासकीय किंवा खासगी कार्यालयात जी व्यक्ती काम करते, त्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी (week off) मिळते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की जनावरांना सुध्दा आठवड्यातून एक दिवस सुट्टी दिली जाते. ही परंपरा झारखंड (jharkhand) या राज्यात लातेहरच्या २० पेक्षा अधिक गावात मागच्या १०० वर्षांपासून सुरु आहे. बैल आणि गाई गुरांना रविवारी काम लावलं जातं नाही. त्या दिवशी त्यांना आठवड्याची सुट्टी दिली जाते. त्या दिवशी सुट्टी देण्याचं कारण असं आहे की, त्यांच्या आठ दिवसाचा थकवा (animal viral news) निघून जाईल.

जनावरांना मिळतो एक दिवस आराम

लातेहार येथील माणूस आणि प्राणी यांच्यात मागच्या जन्मापासून संबंध आहेत. त्यामुळे तिथली माणसं जनावरांना सुख सुविधा अधिक देतात. जनावरांच्या मेहनतीमुळे लोकांचे संसार चालतात. अधिक मेहनत घेणाऱ्या जनावरांना आराम देण्यासाठी लातेहारच्या काही गावात एक नियम तयार केला आहे. त्या दिवशी सगळ्या जनावरांना सुट्टी दिली जाते. म्हणजेच रविवारी कुठल्याही जनावराकडून काम करुन घेतलं जात नाही. गुरांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्याची परंपरा लातेहार जिल्ह्यातील हर्खा, मोंगार, लालगडी आणि पक्रारसह इतर अनेक गावांमध्ये प्रचलित आहे.

गावातल्या लोकांचं हे म्हणणं आहे की, पूर्वीच्या लोकांनी जे नियम तयार केले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाला आराम गरजेचा आहे. त्याचपद्धतीने जनावरांना सुध्दा सुट्टी दिली जाते. जनावर मनुष्याला अधिक मदत करतो, अशा स्थितीत त्यांची काळजी घेणं माणसाचं काम आहे. आम्ही पूर्वीच्या लोकांनी जे काही नियम तयार केले आहेत. ते आम्ही अजूनही पाळत आहोत, ते नियम चांगले आहेत. त्यांनी खूप विचार करुन तो निर्णय घेतला आहे.

ही परंपरा मागच्या १०० वर्षांपासून सुरु आहे. कारण तिथले शेतकरी सांगतात त्यावेळी एका बैलाचा अति कामामुळे मृत्यू झाला होता. त्यावर सगळ्या शेतकऱ्यांनी विचार केला होता. मनुष्याचं आणि बैलाचं काम कमी करण्यासाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी बसलेल्या पंचायतीने निर्णय घेतला होता की, जनावरांना आणि गाईगुरांना एक दिवसाची सुट्टी देण्यात यावी.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.