AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : शेंगतेलाचे दर गगणाला, भुईमूग मात्र कवडीमोलात, शेतकऱ्यांचा निर्धार येणार का कामी?

मुख्य पिकांच्या उत्पादनातून घट झाली असली तरी हंगामी पिकांना अधिकचा दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. शिवाय उन्हाळ्यामध्ये पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज आणि उन्हाळी भुईमूगाची लागवड केली होती. या पिकांना तरी अपेक्षित दर मिळेल असा आशावाद होता पण भुईमूगाला आता केवळ 5 हजार रुपये क्विंटल असा दर आहे.

Nanded : शेंगतेलाचे दर गगणाला, भुईमूग मात्र कवडीमोलात, शेतकऱ्यांचा निर्धार येणार का कामी?
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 9:37 AM
Share

नांदेड : शेतकऱ्यांच्या शेतीमाल असातानाही त्याला दर ठरविण्याचा अधिकार नाही. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले तरी उत्पन्न वाढत नाही हे वास्तव आहे. आता (Edible oil) खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये आठवड्याला वाढ होत असताना दुसरीकडे (Groundnut) भुईमूगाच्या दरात घट होत आहे. शेंगदाण्यावर प्रक्रिया करुनच खाद्यतेलाची निर्मिती होत असली तरी दरातील तफावत ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे भुईमूगाची विक्री करण्यापेक्षा शेतकरी साठवणूकीवरच भर देत आहेत. शेतकऱ्यांना आता योग्य (Groundnut Rate) दराची प्रतिक्षा आहे. सद्यस्थितीला भुईमूगाला 5 हजार रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.

हंगामी पिकांच्या दरात घट

मुख्य पिकांच्या उत्पादनातून घट झाली असली तरी हंगामी पिकांना अधिकचा दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. शिवाय उन्हाळ्यामध्ये पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज आणि उन्हाळी भुईमूगाची लागवड केली होती. या पिकांना तरी अपेक्षित दर मिळेल असा आशावाद होता पण भुईमूगाला आता केवळ 5 हजार रुपये क्विंटल असा दर आहे. गतवर्षीपेक्षा दरात घट झाली असून शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतिक्षा आहे. कांदा, कलिंगड, खरबूज या सर्वच हंगामी पिकांचे दर हे घटलेले आहेत.

साठवणूकीवर भर

पिकांची काढणी झाली की लागलीच विक्री असेच शेतकऱ्यांचे धोरण असते पण आता शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करुन शेतीमालाची विक्री करीत आहे. यापूर्वी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीमध्येही शेतकऱ्यांनी अशीच भूमिका घेतली होती. आता उन्हाळी भुईमूगाची काढणी सुरु असताना केवळ 5 हजार असा दर आहे. वाढीव दर मिळाल्याशिवाय शेतीमालाची विक्री नाही असा निर्धारच शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे काढणी झाली की बाजाररपेठ न दाखिवता आता भुईमूगाच्या शेंगाची थप्पी लावली जात आहे.

भुईमूग क्षेत्रात वाढ

पोषक वातावरणाचा परिणाम भुईमूग क्षेत्रावर झाला आहे. शिवाय यंदा पाण्याची उपलब्धताही होती. नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर या दोन तालुक्यात भुईमुंगाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक संख्येने होते, या दोन्ही तालुक्यातील भुईमुंगाची काढणी आटोपलीय. मात्र सध्या भुईमुंगाला प्रति क्विंटल पाच हजार इतकाच भाव मिळत असल्याने शेतकरी माल साठवून ठेवताना दिसतोय. भुईमुंगाला प्रति क्विंटल सात हजारांचा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तरच उत्पादन खर्च निघून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडणार आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.