AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर शेवट गोड : अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला

वाढत्या थंडीचा फायदा हा फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लागला असून या वातावरणाचा काजू पिकालाही चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे फळधारणा होणार असून उत्पादनातही मोठा फरक पडणार आहे.

अखेर शेवट गोड : अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला
यंदा वातावरणातील बदलामुळे काजू बीचे उत्पादन घटले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 06, 2022 | 11:31 AM
Share

सिंधुदुर्ग : (cold swells the nutritious environment) वाढत्या थंडीचा फायदा हा (Orchards) फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लागला असून या वातावरणाचा काजू पिकालाही चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे (fruit bearing) फळधारणा होणार असून उत्पादनातही मोठा फरक पडणार आहे. मध्यंतरी अवकाळी, अतिवृष्टीनंतर फळबागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. आता केवळ थंडीवरच सर्वकाही अवलंबून होते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून पडलेल्या थंडीचा परिणाम केवळ फळबागांवरच झाला असे नाही तर रब्बी हंगामातील पिकांनाही झालेला आहे.

अवकाळी अन् ढगाळ वातावरणाचा असा झाला परिणाम

अधिकच्या उत्पादनासाठी फळबागांचे व्यवस्थापन हे दरवर्षी चांगलेच केले जाते. यंदा मात्र, निसर्गाचा लहरीपणाचा फटका बागायतदारांच्या व्यवस्थापनाला अडसर ठरला. अन्यथा यंदा पोषक वातावरणामुळे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज शेकतरी वर्तवत होते. मात्र, ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही काजू बागा बहरु लागल्या होत्या पण पुन्हा डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सलग 20 दिवस पावसामध्ये सातत्य राहिल्याने फळधारणा सोडूनच द्या पण मोहर तरी लागतो की नाही अशी आवस्था झाली होती. हे कमी म्हणून की काय ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर रोगराई अन् किडीचा प्रादुर्भाव वाढलेला होता. त्यामुळे उत्पादनाची आशा बागायत शेतकऱ्यांनी सोडून दिली होती.

फळधारणेसाठी पोषक वातावरण

पहिल्या टप्प्यात फळबागांचे नुकसानच झाले आहे. पण आता दुसऱ्या टप्प्यातील वातावरण फळधारणेसाठी पोषक आहे. यापूर्वी आंबा बागांना मोहर लागला होता. आता थंडीचा फायदा हा काजू पिकाला होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकरी पीकपध्दत बदल्याण्याच्या विचारात आहे. यंदा सर्वकाही नुकसानीचे होत असताना वाढत्या थंडीमुळे दिलासा मिळालेला आहे.

थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांचीही वाढ जोमात

फळांमध्ये केळी बागा सोडता थंडी ही सर्वच पिकांसाठी पोषक मानली जात आहे. आंबा, काजूच्या तर फळधारणेसाठी पोषक थंडी ठरत आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांच्या वाढीसाठी देखील हे वातावरण पोषक ठरत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. हरभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, औषध फवारणीनंतर पुन्हा ही पिके बहरत आहेत. यातच राज्यात थंडीचा लाट असल्याने त्याचा फायदा पिकांची वाढ होण्यासाठी होत आहे.

संबंधित बातम्या :

Sangli Market : राज्य सरकारच्या निर्बंधानंतरही हळद अधिकच पिवळी, सांगली बाजारपेठेत सर्वोच्च दर

तूर पीक : हमीभावाने खरेदी, मात्र, संपूर्ण तुरीच्या खरेदीची हमी नाही, वाचा सविस्तर

हिवाळ्यात ब्रॉयलर कोंबड्यांची ‘अशी’ घ्या काळजी मगच मिळेल कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न

Follow Us
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....