पीक जोपासण्यापेक्षा मोडणीवरच भर, महाराष्ट्रातील शेतकरी कशामुळे आहेत हतबल ?

मध्यंतरी अवकाळी पावसामुळे फळबांगाचे नुकसान झाले होते. त्यामधूनच शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. अशातच अवकाळी पावसानंतर वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे तर काढणीला आलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे हतबल शेतकरी हे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी थेट पीक मोडणीवरच भर देत आहे.

पीक जोपासण्यापेक्षा मोडणीवरच भर, महाराष्ट्रातील शेतकरी कशामुळे आहेत हतबल ?
नाशिक जिल्ह्यातील गोल्हेवाडी येथील शेतकऱ्याने मेथीला दर नसल्याने पिकामध्ये जनावरे सोडली आहेत.
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:58 AM

नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पीक मोडणीच्याच घटना समोर येत आहेत. विशेषत: रब्बी हंगामातील आणि काढणीला आलेल्या पिकांबद्दलच शेतकरी असे निर्णय घेत आहेत. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे फळबांगाचे नुकसान झाले होते. त्यामधूनच शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. अशातच अवकाळी पावसानंतर वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे तर काढणीला आलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे हतबल शेतकरी हे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी थेट पीक मोडणीवरच भर देत आहे. नाशिक जिल्ह्यात तर अशा घटना वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्याने एक एक्कर कांद्यावर रोटोवेटर फिरवले होते. तर आता गोल्हेवाडी येथील शेतकऱ्याने मेथीच्या शेतामध्ये थेट जनावरे चारण्यासाठी सोडलेली आहे. कीड-रोगराई आणि बाजारपेठेतील कवडीमोल दर यामुळे शेतकरी टोकाचे भूमिका घेत आहेत.

वातावरणातील बदल अन् पिकावर परिणाम

अवकाळी पावसाने फळपिकांचे नुकसान तर झालेच आहे. पण त्यानंतर धुके आणि ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगराईचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये रब्बी हंगामातील कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता कांदा लागवड करुन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. ऐन कांदा पोसण्याच्या दरम्यानच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कांदा जोपासण्यापेक्षा अधिकचे नुकसान टाळण्यासाठी काढणी करुन बांधावरच फेकला जात आहे.

कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच विदारक चित्र

गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वी झालेले अवकाळी पाऊस आणि दाट धुक्याचा परिणाम आता शेती पिकांवर होण्यास सुरुवात झाली आहे. शेती पिके खराब होत असल्याने येवल्यातील शेतकऱ्याने उभे कांद्याच्या पिकानंतर अद्रक आणि आता मेथीच्या पिकावर रोटर फिरवत मेथीचे उभे पीक आता चारा म्हणून जनावरांनासमोर आहे. राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यात तर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे त्यांच्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहेत तर दुसरीकडे बाजारपेठेत शेतीमालाला दर मिळत नाहीत. पपई पिकाला 2 ते 3 रुपये किलोचा दर मराठवाड्यात आहे. त्यामुळे थेरगाव येथील शेतकऱ्याने 7 एकरातील 7 हजार पपई झाडांची मोडणी केली होती. वर्षभर पपई बाग जोपासून काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. तर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गोल्हेवाडी येथील शेतकरी सुभाष कोतकर यांनी एक एकर क्षेत्रामध्ये मेथीच्या भाजीचे पीक घेतले होते भाजी निघण्यास सुरुवात झाली मात्र, या मेथीच्या भाजीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जनावरे चरण्यास सोडली तसेच मेथी भाजीच्या क्षेत्रावर ही ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर मारून नष्‍ट करून टाकली.

 संबंधित बातम्या :

नैसर्गिक शेती’ची सुरवात अन् प्रवास, आता देशात घेतली जातेय दखल..!

मोसंबीच्या व्यवस्थापनासाठी मराठवाड्यात ‘सिट्रस इस्टेट’ची घोषणा, नेमका काय होणार फायदा ?

एवढंच राहिलं होत..! ऊसाच्या पाचटामधूनही शेतकऱ्यांची लूट, कारवाईसाठी मुख्यमंत्र्याना पत्र

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.