AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाळिंबापेक्षाही टोमॅटो महाग, केव्हा मिळणार दिलासा? केंद्र सरकारनेच सांगितला तोडगा

मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसाचा परिणाम अद्यापही बाजारपेठेवर जाणवत आहे. सध्या टोंमॅटो उत्पादक राज्यातून टोमॅटोची आवक होत नसल्याने दर गगणाला भिडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात 65 रुपये किलो तर राजधानी दिल्ली येथे 75 रुपये किलो टोमॅटोची विक्री होत आहे. दुसरीकडे फळ असणारे डाळिंब हे 50 रुपये किलो मिळू लागले आहे.

डाळिंबापेक्षाही टोमॅटो महाग, केव्हा मिळणार दिलासा? केंद्र सरकारनेच सांगितला तोडगा
टोमॅटो
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 12:52 PM
Share

मुंबई : मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसाचा परिणाम अद्यापही बाजारपेठेवर जाणवत आहे. सध्या टोंमॅटो उत्पादक राज्यातून टोमॅटोची आवक होत नसल्याने दर गगणाला भिडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात 65 रुपये किलो तर राजधानी दिल्ली येथे 75 रुपये किलो टोमॅटोची विक्री होत आहे. दुसरीकडे फळ असणारे डाळिंब हे 50 रुपये किलो मिळू लागले आहे. अतिवृष्टीने केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसा झाले होते. त्यामुळेच आता आवक घटली असून दर हे वाढत आहेत. डिसेंबरपर्यंत असेच दर राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, “देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून टोमॅटोचे आगमन डिसेंबरच्या सुरुवातीपासून सुरू होईल. यामुळे आवक वाढेल आणि किंमती कमी होतील. डिसेंबरमध्ये आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अणखीन काही दिवस तरी अधिकच्या दरानेच टोमॅटोची खरेदी करावी लागणार आहे.

पावसामुळे टोमॅटोचे नुकसान होते

यावर्षी नोव्हेंबरमध्ये 19 लाख 62 हजार टन टोमॅटोची आवक झाली तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही आवक 21 लाख 32 हजार दशलक्ष टन होती. टोमॅटोच्या दरवाच्या कारणाबाबत मंत्रालयाने सांगितले की, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात बेमोसमी पावसामुळे सप्टेंबरअखेरपासून टोमॅटोच्या किरकोळ किंमती वाढल्या आहेत. पावसामुळे टोमॅटोपिकाचे नुकसान झाले आणि या राज्यांमधून होणारी आवक ही लांबणीवर पडलेली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पाऊस पडला आणि पुरवठा खंडित झाला आहे. शिवाय पिकांचेही नुकसान झाले. मंत्रालयाने सांगितले की, टोमॅटोची किंमत अत्यंत अस्थिर आहे. टोमॅटोचा पुरवठा होण्यास झालेल्या उशिरामुळेच सध्याचे दर वाढत आहेत.

वाढत्या मागणीचाही परिणाम दरावर

सबंध देशात टोमॅटो हा 65 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सध्याची परस्थिती निर्माण झाली आहे. या महिन्यात 25 नोव्हेंबरपर्यंत टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किंमत 67 रुपये प्रति किलो होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 63 टक्क्यांनी जास्त आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षात टोमॅटोचे खरीप उत्पादन गेल्या वर्षीच्या 70 लाख 12 हजार टनाच्या तुलनेत 69 लाख 52 हजार टन आहे.

महाराष्ट्रात 65 रुपये किलो टोमॅटोचा दर

गेल्या काही दिवसांपासून सर्वच राज्यांमध्ये टोमॅटोच्या किंमती ह्या वाढत आहेत. महाराष्ट्रात तर 65 रुपये किलोपर्यंत दर गेले असून आता डाळिंबापेक्षाही टोमॅटोला अधिकचा भाव आला आहे. फळांना प्रमाणे टोमॅटोला महत्व आले आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत टोमॅटोच्या किरकोळ किंमती 75 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले, तर दक्षिण भारताच्या काही भागात किंमती कमी झाल्या, पण किंमत अजूनही जास्त आहे. उत्तर भारतातील राज्यांमधून टोमॅटोची आवक होत नाही तोपर्यंत दर असेच राहणार आहेत.

संबंधित बातम्या :

काय सांगता? एकरकमी विजबिल थकबाकी भरल्यास 50 टक्के सूट, शेतकऱ्यांना सुवर्णसंधी

जनावरांची देखरेख आता पशुमंडळाकडे, कामधेनूच्या गावात वाढले दुधाचे उत्पादन

Smart Farmers : ‘ई-पीक पाहणी’चा पहिला टप्पा यशस्वी आता ‘ई-पंचनामाचे’ अव्हान

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.