AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana : गतवर्षीच्या दराचा परिणाम यंदाच्या फळपिकांच्या लागवडीवर, नंदूरबारमध्ये पीक पध्दतीमध्ये बदल

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रतिकूल परस्थिती यामुळे पपई व केळी उत्पादनात मोठी घट झाली होती. शिवाय उत्पादित मालही दर्जात्मक नसल्याने त्यालाही कवडीमोल किंमत अशी स्थिती निर्माण झाल्याचा सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्यांनी घेतला होता. या फळपिकांची कवडीमोल दरात खरेदी केली जात होती.

Banana : गतवर्षीच्या दराचा परिणाम यंदाच्या फळपिकांच्या लागवडीवर, नंदूरबारमध्ये पीक पध्दतीमध्ये बदल
यंदा नंदूरबार जिल्ह्यामध्ये केळी उत्पादन क्षेत्रात घट होणार आहे. Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 30, 2022 | 11:41 AM
Share

नंदूरबार : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम शेती व्यवसयावर किती दीर्घकाळ राहतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे (Orchard) फळबागांचे घटते क्षेत्र. योजनांच्या लाभातून फळबाग क्षेत्र वाढवण्याचे आवाहन (Agricultural Department) कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात असले तरी शेतकऱ्यांची समस्या ही वेगळीच आहे. गतवर्षी (Unseasonable Rain) अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे केळीसह पपईच्या उत्पादनावर परिणाम परिणाम झाला होता. या दोन्ही फळपिकातून उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही पदरी पडला नव्हता. त्यामुळेच यंदा केळी अन् पपईच्या लागवडीकडे या भागातील शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी पुणे, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून केळीच्या रोपांची मागणी होत असते पण मे महिना सुरु झाला तरी अजून रोपांबाबत विचारणाही होत नसल्याने यंदा केळी आणि पपईचे क्षेत्र घटणार असा अंदाज आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील रोपवाटिका परराज्यात

नंदूरबार जिल्ह्यात केळी आणि पपईचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच या भागात रोपवाटिकाही अधिक आहेत. दरवर्षी येथून मुख्य बाजारपेठेत केळी आणि पपईच्या रोपांची मागणी असते. शिवाय भौगोलिक वातावरण पोषक असल्याने जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यामध्येही या फळपिकांचे क्षेत्र अधिक आहे. पण यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमुळे सरासरी एवढ्या क्षेत्रावर तरी लागवड होते की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. गतवर्षीचे नुकसान आणि घटलेले दर याचा परिणाम यंदाच्या हंगामावर दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची अडचण, व्यापाऱ्यांची मनमानी

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रतिकूल परस्थिती यामुळे पपई व केळी उत्पादनात मोठी घट झाली होती. शिवाय उत्पादित मालही दर्जात्मक नसल्याने त्यालाही कवडीमोल किंमत अशी स्थिती निर्माण झाल्याचा सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्यांनी घेतला होता. या फळपिकांची कवडीमोल दरात खरेदी केली जात होती. शिवाय उत्पादक शेतकऱ्यांकडे कोणता पर्यायही नसल्याने मागेल त्या किंमतीमध्ये विक्री अशी स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी अडचणीत असताना व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीतून उत्पादनावरील खर्चही शेतकऱ्यांना मिळाला नाही.

यंदा केळी, पपईच्या क्षेत्रात घट

गतवर्षीच्या प्रतिकूल परस्थितीचा परिणाम यंदाच्या फळपिकांच्या लागवडीवर होणार आहे. घटलेले उत्पादन आणि दर यामुळे केळी आणि पपईचे उत्पादन घ्यावे की नाही द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी आहेत. पपईला एकरी 70 हजार रुपये खर्च आहे. याप्रमाणातही उत्पन्न मिळते की नाही यामुळे शेतकरी माघार घेत आहे. निसर्गावर आधारित शेती तर दर बेभरवश्याचे यामुळे फळ बागायतदार शेतकरीही अडचणी आले आहेत.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?