AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Report : राज्यातील 6 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट, पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट

राज्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसानं दडी मारली आहे. मान्सूननं दडी मारल्यानं राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत.

Weather Report : राज्यातील 6  जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट, पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 10:37 AM
Share

औरंगाबाद: महाराष्ट्रात जून महिन्यात दरवर्षीपेक्षा मान्सून पावसानं हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली होती. राज्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसानं दडी मारली आहे. मान्सूननं दडी मारल्यानं राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड,नंदुरबार,नाशिक अकोला धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Aurangabad Beed Nandurbar Nashik Akola Dhule districts facing problems due to low rain)

दुबार पेरणीचं संकट

महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनावेळी झालेल्या पावसाच्या जोरावर 22 जूनपर्यंत 27 टक्के पेरण्या पार पडल्या होत्या. मात्र, पावसात खंड पडल्यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांपुढं दुबार पेरणीरचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. कापूस, मका ,तूर आणि सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्याचं समोर आलं आहे.

अर्ध्या महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस नाही

नाशिक, धुळे, अकोला आणि नंदुरबार जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत. यंदा 25 ते 50 टक्के कमी पाऊस झाला आहे. नंदुरबार मध्ये 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर नाशिक,धुळे,अकोला मध्ये 25 टक्के कमी पाऊस झाल्यानं दुष्काळाचं सावट आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. निम्म्या महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस नसल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

राज्यात 7 आणि 8 जुलैला पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.

राज्यात कुठे पाऊस पडणार?

हवामान विभागानं राज्यातील काही भागात 7 आणि 8 जुलैला पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्याअंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

Weather Report : राज्यात मान्सून कधी परतणार, हवामान विभागाचा नवा अंदाज, जून महिन्यात कुठं किती पाऊस झाला? वाचा सविस्तर

Weather report: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज

(Maharashtra Aurangabad Beed Nandurbar Nashik Akola Dhule districts facing problems due to low rain)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.