AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात, पिकांवरचं संकट कायम

महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. खरीप हंगाम वाया जाणार असल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली आहे.

Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात,  पिकांवरचं संकट कायम
maharashtra newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2023 | 9:13 AM
Share

महाराष्ट्र : नंदूरबार (Maharashtra rain update) तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस गायब झाल्यामुळे पिके (crop destroyed) धोक्यात आली आहेत. त्याचबरोबर पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर आता एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटले असले, तरीही पूर्व भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी हलका ते मध्यम पावसावर पिकांची पेरणी आणि कापूस लागवड (cotton cultivation) केली होती. शेतकऱ्यांनी निंदणी व कोळपणी अशी आंतर मशागतीचे कामे उरकून पिकांना खते आणि फवारणीचे कामे सुरू आहे.

शेती पिकाला पाणीचं नसल्याने फवारणी केल्याने काय फायदा होणार असे अनेक प्रश्न आता बळीराजासमोर उपस्थित झाला आहे. येणाऱ्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावा लागणार अशी परिस्थिती आता नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात पाहायला मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये पाऊस गायब झाला आहे. तालुक्यात रिमझिम पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी कशीबशी आटोपली आहे. जुलै महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी जोरदार पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. अनेकांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करावी लागली. मात्र जोरदार पाऊस नसल्याने बोरवेल पाणीपातळीही घटू लागली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त आहेत.

धुळे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागतीवर भर दिलेला आहे. वारंवार कोळपणी आणि निंदणी करून तन वाढु न देण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत, जेणेकरून पिकांना तूरळक पावसातही तग धरायला मदत होईल. मात्र मेहनतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे आणि शेतकऱ्यांना जास्त मेहनतही घ्यावी लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा मुसळधार पावसाची आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.