AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात, पिकांवरचं संकट कायम

महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. खरीप हंगाम वाया जाणार असल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली आहे.

Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात,  पिकांवरचं संकट कायम
maharashtra newsImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 19, 2023 | 9:13 AM
Share

महाराष्ट्र : नंदूरबार (Maharashtra rain update) तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस गायब झाल्यामुळे पिके (crop destroyed) धोक्यात आली आहेत. त्याचबरोबर पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर आता एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटले असले, तरीही पूर्व भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी हलका ते मध्यम पावसावर पिकांची पेरणी आणि कापूस लागवड (cotton cultivation) केली होती. शेतकऱ्यांनी निंदणी व कोळपणी अशी आंतर मशागतीचे कामे उरकून पिकांना खते आणि फवारणीचे कामे सुरू आहे.

शेती पिकाला पाणीचं नसल्याने फवारणी केल्याने काय फायदा होणार असे अनेक प्रश्न आता बळीराजासमोर उपस्थित झाला आहे. येणाऱ्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावा लागणार अशी परिस्थिती आता नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात पाहायला मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये पाऊस गायब झाला आहे. तालुक्यात रिमझिम पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी कशीबशी आटोपली आहे. जुलै महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी जोरदार पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. अनेकांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करावी लागली. मात्र जोरदार पाऊस नसल्याने बोरवेल पाणीपातळीही घटू लागली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त आहेत.

धुळे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागतीवर भर दिलेला आहे. वारंवार कोळपणी आणि निंदणी करून तन वाढु न देण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत, जेणेकरून पिकांना तूरळक पावसातही तग धरायला मदत होईल. मात्र मेहनतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे आणि शेतकऱ्यांना जास्त मेहनतही घ्यावी लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा मुसळधार पावसाची आहे.

Follow Us
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....