.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारचा मोठा निर्णय : 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये उभारले जाणार हवामान केंद्रे, नेमका काय होणार फायदा?

राज्यभरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा एवढेच नाही तर त्यामुळे पिकांची काय काळजी घेतली जावी याबाबत माहिती मिळावी व अन्य तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यभरातील 6 हजार ग्रामपंचायतीमझध्ये हवामान केंद्र उभारले जाणार आहेत.

राज्य सरकारचा मोठा निर्णय : 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये उभारले जाणार हवामान केंद्रे, नेमका काय होणार फायदा?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 07, 2022 | 10:33 AM
Share

पुणे : राज्यभरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा एवढेच नाही तर त्यामुळे पिकांची काय काळजी घेतली जावी याबाबत माहिती मिळावी व अन्य तांत्रिक चुकांमुळे (Farmers) शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यभरातील 6 हजार ग्रामपंचायतीमझध्ये (Weather Stations) हवामान केंद्र उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 5 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असेलेल्या (Villages) गावांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगतिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे योग्य नियोजन करुन उत्पादनात वाढ होईल असा यामागचा उद्देश आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे शेतकऱ्यांना हवेचा अंदाज, वाऱ्याचा वेग, पावसाचे प्रमाण याचा अंदाज बांधता येणार आहे.

नुकसानभरपाई बाबतच्या अडचणीवर होणार मात

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहेच पण होणाऱ्या पावसाची योग्य नोंद नसल्यामुळे देखील अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे आता गावनिहाय पावसाचे प्रमाणाची नोंद या हवामान केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचा विषयच येणार नाही. उलट वेगवेगळ्या बाबींमध्ये या हवामान केंद्राचा फायदाच शेतकऱ्यांना होणार आहे. पाऊस, वारा, अवकाळी यामुळे होणाऱ्या नुकसानीची नोंद ही तंत्रशुध्द पध्दतीने होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठकी दरम्यान सांगितलेले आहे.

सध्या काय आहे स्थिती..?

सध्या केवळ महसूल मंडळाच्या ठिकाणीच ही हवामान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. अशी 2 हजार 118 केंद्र ही अनेक वर्षापूर्वी उभारलेली आहेत. शिवाय यामधील अनेक ही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे योग्यरित्या तापमानाची ना पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे एकाच मंडळात काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर काही शेतकरी हे मदतीपासून वंचित राहतात. याबाबतच्या तक्रारी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे 5 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत स्थरावर ही केंद्र उभारली जाणार आहेत. शिवाय ही स्वयंचलित असल्याने याचा अधिकच्या खर्चाचा भारही येणार नाही.

शेतकऱ्यांना असा हा उपयोग

नुकसानभरपाईच्या दरम्यान, विमा कंपन्या ह्या स्कायमेट कडूनच सर्व माहिती घेतात. मात्र, आता ही व्यवस्था मंडळाच्या ठिकाणीच आहे. त्यामुळे तत्परता येत नाही. उद्या ग्रामपंचायत ठिकाणी अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी झाली तरी तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कृषीविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेषत: पीक विमा नुकसानभरपाईच्या दरम्यान याचा लाभ होणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीच्या ठिकाणी याची उभारणी केली जावी अशा सुचना देण्यात आल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगतिले आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Prices : शेतकऱ्यांनाच समजले बाजारपेठेतले अर्थकारण, अन् झाला ‘हा’ बदल

फळ-भाज्यांचे एसी दुकान उभारण्यासाठीही आता 75 टक्के अनुदान, कोणत्या सराकरचा आहे हा निर्णय?

Positive News : सोयाबीनच्या दरात अन् आवकमध्येही वाढ, शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला ?

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर