AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या छतावर करा भाजीपाल्याची शेती; हजारो रुपयांची होईल बचत

घरी भाजीपाला काढून हजारो रुपये वाचवले जाऊ शकतात. यासाठी थोडीसी मेहनत करावी लागेल.

घराच्या छतावर करा भाजीपाल्याची शेती; हजारो रुपयांची होईल बचत
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 08, 2023 | 8:06 PM
Share

नवी दिल्ली : देशात महागाई वाढत आहे. भाजीपाल्यासह खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत. सामान्य व्यक्तीच्या किचनचे बजेड कोलमडत आहे. विशेषतः टोमॅटोच्या किमतीने साऱ्यांना बेजार केले आहे. टोमॅटो १४० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. शिमला मिरची, भेंडी, कारले, लवकी, सांभार आणि हिरवी मिरची यांचे भावही वाढले आहेत. यामुळे काही जणांनी टोमॅटोसह हिरवी मिरची खाणे सोडले आहे. घरी भाजीपाला काढून हजारो रुपये वाचवले जाऊ शकतात. यासाठी थोडीसी मेहनत करावी लागेल.

शहरात टेरेस फार्मिंगचे प्रमाण वाढत आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, वांगे यासह इतर भाजीपाला काढता येऊ शकतो. यामुळे लोकांना ताजा आणि हिरवा भाजीपाला मिळेल. महागाईच्या दिवसांत हजारो रुपयांची बचत होऊ शकेल. राज्य सरकार वेळोवेळी टेरेस गार्डनिंगसाठी अनुदानही देत असते. बिहार सरकार टेरेस फार्मिंगसाठी जिल्ह्यानुसार अनुदान देते.

८० ते १०० रुपयांत एक कुंडी

घरी शेती करत असाल तर २१ बाय २१ इंचीच्या १० कुंड्या खरेदी कराव्या लागतील. ८० ते १०० रुपयांपर्यंत या कुंड्या मिळू शकतात. माती, शेण टाकून टोमॅटोची लागवड करू शकता. मध्यंतरी पाणी द्यावे लागते. अडीच महिन्यानंतर टोमॅटोचे उत्पादन सुरू होते. पुसा हायब्रीड २, पुसा हायब्रीड ४ अशा जातीचे टोमॅटो लावता येतील. या जातीच्या टोमॅटोचे चांगले उत्पादन मिळते. घराच्या छतावर टोमॅटो काढल्यास महिन्याचे हजार रुपये वाचवू शकता.

६५ दिवसांनंतर शिमला मिरचीचे उत्पादन

बाजारात शिमला मिरची खूप महाग झाली आहे. दिल्लीत शिमला मिरचीची किंमत ६० ते ८० रुपये किलो आहे. टोमॅटोप्रमाणे शिमला मिरचीसुद्धा घरी काढू शकता. यासाठी तुम्हाला २१ इंज बाय २१ इंचीच्या कुंड्या खरेदी कराव्या लागतील. त्यात माती भरून शिमला मिरची सोलन हायब्रीड २ आणि ओरोबेल जातीच्या शिमला मिरच्या लावता येईल. बीज लावल्यानंतर ६० ते ६५ दिवसानंतर उत्पादन सुरू होईल. दहा कुंड्यांमध्ये शिमला मिरची लावत असाल तर ६५ दिवस रोज एक किलो शिमला मिरची मिळेल.

सांभार लावा घरी

सांभार बाजारात २०० रुपये किलो विकला जातो. सांभार लावून तुम्ही शेकडो रुपये वाचवू शकता. ताजी आणि हिरव्या सांभाराची भाजी खायला मिळेल. सांभारासाठी तुम्हाला आयात आकाराचा ट्रे खरेदी करावा लागेल. माती टाकून सांभार टाकता येईल. तीस दिवसानंतर सांभाराचे उत्पादन सुरू होते.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं