AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert: महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज

पुढच्या दोन दिवसांमध्ये  विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Alert)

Weather Alert: महाराष्ट्रात येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज
अतिवृष्टीचा इशारा
| Updated on: Apr 14, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये  विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Nagpur IMD alerts Thunderstorms with lightning and rain in Vidarbha )

महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार?

प्रादेशिक हवामान केंद्र , नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिमध्ये 16 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूर हवामान विभागाचं ट्विट

मुंबई वेदर या ट्विटर अकाऊंटवरुनही पावसाचा अंदाज

मंगळवारी राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

मंगळवारी दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोल्हापूर, हिगोली, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. कोल्हापुरात अनेक भागात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले तसेच हायस्कूलच्या इमारतीचेही मोठं नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अहमदनगर शहरासह ग्रामिण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने कांद्याच नुकसान होणार आहे.

सोलापूरमध्ये द्राक्ष बागांचं नुकसान

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाबरोबर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतामध्ये असलेल्या पिकांचे झाली माती. ग्रामीण भागात द्राक्ष, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू ,कडबा यांचे अतोनात नुकसान झालं आहे. तर, काही ठिकाणी बेदाणा शेड उडून गेल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या:

कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यासाठी पुढचे तीन तास महत्वाचे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

(Nagpur IMD alerts Thunderstorms with lightning and rain in Vidarbha)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.