AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 238 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप; उर्वरित निधी 15 दिवसांच्या आत मिळणार

नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या (District Bank) माध्यमातून आतापर्यंत 238 कोटी रुपयांचे अनुदान (Grants) वाटप करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.

नांदेड : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 238 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप; उर्वरित निधी 15 दिवसांच्या आत मिळणार
debt relief Don't lend today by mistake or you will suffer bad consequences
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 8:04 PM
Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या (District Bank) माध्यमातून आतापर्यंत 238 कोटी रुपयांचे अनुदान (Grants) वाटप करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील 66 हजार 464 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्याचे अनुदान म्हणून जिल्ह्याला 424 कोटी रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाला आहे. त्या निधीपैकी आतापर्यंत 238 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये हा निधी वाटप करण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत 238  कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित अनुदानाची रक्कम येत्या 15 दिवसांमध्ये वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आली आहे. या अनुदानामुळे काहीप्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान

गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे खरीप पिक हातचे गेले. जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्याप्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका सोयाबीनला बसला होता. पावसामुळे पीक खराब झाले, पिक खराब झाल्याने उत्पन्नात देखील मोठी घट झाली होती. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत अनुदानाची रक्कम देखील येत्या 15 दिवसांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली.

उन्हाळी सोयाबीनची लागवड

दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक वाया गेले. उत्पन्नामध्ये घट झाल्याने सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता मोठ्याप्रमाणात उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. उन्हाळी सोयाबीनचा उपयोग हा प्रामुख्याने बियाण्यांसाठी केला जातो. उन्हाळी सोयाबीनला आता शेंगा लागायला सुरूवात झाली आहे.

संबंधित बातम्या

Onion: बाजार समितीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका, कांदा उत्पादक संघटनेच्या पत्रात दडलंय काय?

Latur Market: सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात, दर घटूनही शेतकऱ्यांवर ‘ही’ नामुष्की..!

फडातले वास्तव आयुक्तांसमोर : एफआरपी, ऊसाच्या प्रश्न बाजूलाच तोडणी अन् वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूटच

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.