AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला

यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया  मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला
कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजरImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 8:03 AM
Share

मालेगाव – निसर्गाच्या लहरीपणाला आणि अनियमित वीज पुरवठा (Power supply) असताना देखील मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने (Farmer) कांदा पिकविला. पण बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा (Onion) विक्री न करता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतिक्षेत कांदा चाळीत साठवण करुन ठेवला. मात्र कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर पडली अन् त्याने थेट कांदा चाळीतच युरिया मिश्रीत पाणी टाकले. त्यामुळे संपूर्ण कांदा नासला आहे. झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्याचे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाल्याची घटना लोणवाडे शिवारात घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.

मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले

पोलिसांकडे दाखल झालेली माहिती अशी आहे की, कांदा उत्पादक शेतकरी तुषार भुसे (रा. सोयगाव, मालेगाव) यांची लोणवाडे शिवारात शेती आहे. त्यांनी यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे भुसे यांचे तब्बल 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलील हवालदार खांडेकर तपास करीत आहेत.

शेतकऱ्यांची कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अनेकदा चांगल्या आलेल्या पीकाचे नुकसान केले जाते. केळीच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित इसमांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची असते. कारण शेती करताना अधिक काबाडकष्ठ घ्यावे लागतात.

हाता तोंडाला आलेलं पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांचं वार्षिक आर्थिक बजेट कोलमडतं असतं. मालेगाव झालेल्या पीकाच्या नुकसानीनंतर अनेक शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.