Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला

यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया  मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला
कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 8:03 AM

मालेगाव – निसर्गाच्या लहरीपणाला आणि अनियमित वीज पुरवठा (Power supply) असताना देखील मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने (Farmer) कांदा पिकविला. पण बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा (Onion) विक्री न करता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतिक्षेत कांदा चाळीत साठवण करुन ठेवला. मात्र कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर पडली अन् त्याने थेट कांदा चाळीतच युरिया मिश्रीत पाणी टाकले. त्यामुळे संपूर्ण कांदा नासला आहे. झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्याचे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाल्याची घटना लोणवाडे शिवारात घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.

मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले

पोलिसांकडे दाखल झालेली माहिती अशी आहे की, कांदा उत्पादक शेतकरी तुषार भुसे (रा. सोयगाव, मालेगाव) यांची लोणवाडे शिवारात शेती आहे. त्यांनी यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे भुसे यांचे तब्बल 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलील हवालदार खांडेकर तपास करीत आहेत.

शेतकऱ्यांची कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अनेकदा चांगल्या आलेल्या पीकाचे नुकसान केले जाते. केळीच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित इसमांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची असते. कारण शेती करताना अधिक काबाडकष्ठ घ्यावे लागतात.

हे सुद्धा वाचा

हाता तोंडाला आलेलं पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांचं वार्षिक आर्थिक बजेट कोलमडतं असतं. मालेगाव झालेल्या पीकाच्या नुकसानीनंतर अनेक शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.