AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला

यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

Nashik : कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया  मिश्रीत पाणी टाकल्याने कांदा नासला
कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजरImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 8:03 AM
Share

मालेगाव – निसर्गाच्या लहरीपणाला आणि अनियमित वीज पुरवठा (Power supply) असताना देखील मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने (Farmer) कांदा पिकविला. पण बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा (Onion) विक्री न करता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतिक्षेत कांदा चाळीत साठवण करुन ठेवला. मात्र कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर पडली अन् त्याने थेट कांदा चाळीतच युरिया मिश्रीत पाणी टाकले. त्यामुळे संपूर्ण कांदा नासला आहे. झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्याचे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाल्याची घटना लोणवाडे शिवारात घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.

मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले

पोलिसांकडे दाखल झालेली माहिती अशी आहे की, कांदा उत्पादक शेतकरी तुषार भुसे (रा. सोयगाव, मालेगाव) यांची लोणवाडे शिवारात शेती आहे. त्यांनी यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे भुसे यांचे तब्बल 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलील हवालदार खांडेकर तपास करीत आहेत.

शेतकऱ्यांची कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अनेकदा चांगल्या आलेल्या पीकाचे नुकसान केले जाते. केळीच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित इसमांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची असते. कारण शेती करताना अधिक काबाडकष्ठ घ्यावे लागतात.

हाता तोंडाला आलेलं पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांचं वार्षिक आर्थिक बजेट कोलमडतं असतं. मालेगाव झालेल्या पीकाच्या नुकसानीनंतर अनेक शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.