AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पर्याय शोधा-नितीन राऊत

दुर्गम भागातील शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा 8 तास सवलतीच्या दरात वीज (Elecricity) पुरवठा करण्यासाठी सर्व पर्यायांची चाचपणी करा,असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज महावितरणला दिले.

नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पर्याय शोधा-नितीन राऊत
नितीन राऊत, ऊर्जा मंत्री
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 5:29 PM
Share

मुंबई : नक्षलग्रस्त, जंगल परिसरातील व भौगोलिक दृष्टया दुर्गम भागातील शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा 8 तास सवलतीच्या दरात वीज (Elecricity) पुरवठा करण्यासाठी सर्व पर्यायांची चाचपणी करा,असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज महावितरणला दिले. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरविल्यावर महावितरणला (MSEB) अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही अशा पर्यायांचा विचार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील वीज पुरवठा संदर्भात आज चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मुंबई स्थित महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगल आणि लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेताला पाणी देण्यासाठी दिवसा वीज मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला.

नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यातील कृषिपंपाना दिवसा 8 तास वीज पुरवठा केल्यास वीज खरेदीसाठी अतिरिक्त दीड कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील जिल्हा विकास योजनेतून निधी प्राप्त झाल्यास दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होईल, असे डॉ. राऊत यावेळी म्हणाले. या पर्यायाचे स्वागत आमदार धानोरकर यांनी केले आणि या पर्यायानुसार जिल्हा विकास योजनेतून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. दुर्गम भागात राहणाऱ्या ग्राहकांचा तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अश्या भागासाठी वीज दर व पुरवठा याविषयी नवीन धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

फसव्या संदेशांचा शोध घ्या

वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, अशा स्वरूपाचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आज दिले. त्यानंतर तातडीने पावले उचलत महावितरणने मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महावितरणच्या नावाने वीज ग्राहकांची अशा पध्दतीने दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे. महावितरणची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका यावेळी डॉ. राऊत यांनी घेतली. अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये असे आवाहनही डॉ. राऊत यांनी ग्राहकांना केले आहे. केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेट वे च्या माध्यमातूनच विज बिल भरावे . याशिवाय सर्व ग्राहकांनी आपले थकित बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,अशी विनंती यानिमित्ताने डॉ, राऊत यांनी ग्राहकांना केली आहे.

किसान रेलमुळे चिक्कूला मिळाली बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् खर्चात बचत

नियम साखर कारखान्यांसाठी नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच, ‘त्या’ निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक

वीज कापायला आल्यास ‘झटके’ देऊ, रघुनाथ पाटलांचा इशारा, न्यायालयाचे आदेश काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.