AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : बनावट बियाणे विक्रीबाबत कृषी मंत्र्यांचे मोठे विधान, खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही

सध्या पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नेमकी पेरणी करावी की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परस्थितीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सातारा जिल्ह्यातील वाढे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर 70 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरवात करु नये.

Kharif Season : बनावट बियाणे विक्रीबाबत कृषी मंत्र्यांचे मोठे विधान, खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही
कृषिमंत्री दादा भुसेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 9:34 AM
Share

सातारा : अद्याप खरिपाच्या पेरणीला सुरवात झाली नसली तरी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. (Kharif Sowing) पेरणीसाठी आवश्यक असलेल्या (Bogus Seed) बियाणांमध्ये आणि खतामध्ये बनावटपणा आढळून आल्यास केवळ फौजदारी गुन्हेच नाहीतर कडक कारवाई करुन शेतकऱ्यांची लूट थांबवण्याच्या सूचना राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात सध्या (Monsoon) मान्सूनचे आगमन झाले असले तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता अपेक्षित पाऊस झाल्यावर पेरणीचा श्रीगणेशा करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात खत आणि बी-बियाणे विक्रीमध्ये अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. मात्र, कृषी विभागाने केलेली कारवाई ही कौतुकास्पद असून कोणत्याही परस्थितीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याबाबत कृषी विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा

सध्या पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नेमकी पेरणी करावी की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परस्थितीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सातारा जिल्ह्यातील वाढे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर 70 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरवात करु नये. खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या तरी उत्पादनात फरक पडणार नाही. त्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या तरी कमी कालावधीचे सोयाबीन वाण वापरल्यास उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पेरणीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

फौजदारी गुन्हेच नाही तर आता कठोर कारवाई

राज्यात खरिपाच्या बी-बियाणे आणि खत विक्रीला सुरवात होताच बोगस बियाणे समोर येत आहे. यावर अंकूश घालता यावा यासाठी कृषी विभागाने तालुकानिहाय भरारी पथकाची नेमणूक केली आहे. बियाणे विक्रीचा परवाना, खताचा साठा शिवाय लिंकिंगची जबरदस्ती यासारख्या बाबीवर कृषी विभागाचे लक्ष असून अनियमितता आढळून आल्यास केवळ फौजदारी गुन्हेच नाही तर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कृषी मंत्र्यांनीच उत्तरे दिल्याने प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

15 जुलैपर्यंत खरिपाचा पेरा

यंदा पेरणीला उशीर झाला असला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही आणि खर्चही वाया जाणार नाही अशी काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी केली तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावरणार आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्या 15 जुलैपर्यंत केल्या तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही. अधिकचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या सोयाबीन बियाणाचा वापर करण्याचा सल्लाही मंत्री भुसे यांनी दिला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.