AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chilly Market : तेजा मिरची ‘तेजीत’, हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर, यंदा काय राहणार मार्केटचे चित्र?

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा बाजारपेठ ही मिरचीसाठी प्रसिध्द आहे. याचे वेगळेपण म्हणजे हंगाम सुरु होण्यापूर्वीच या बाजारपेठेत मिरचीची आवक होण्यास सुरवात होते. यंदा तशीच काहीशी परस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून मिरची आवकला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी तेजा मिरचीला 4 हजार 511 रुपये क्विंटल असा दर मिळालाय.

Chilly Market : तेजा मिरची 'तेजीत', हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर, यंदा काय राहणार मार्केटचे चित्र?
तेजा मिरची
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 17, 2022 | 6:35 AM
Share

औरंगाबाद : तसं पाहिला गेलं तर (Chilly Season) मिरचीचा हंगाम सुरु होण्यासाठी आणखीन महिन्याभराचा कालावधी आहे. पण जिल्ह्यातील आमठाणा बाजार समितीचे आणि या भागात उत्पादन घेतले जाणाऱ्या (Teja Chilly) तेजा फोर मिरचीचे वेगळेपण आहे की हंगामाच्या 1 महिना आगोदर येथील मिरची बाजारात दाखल होते. यामुळे यंदा मिरचीच्या दराचे चित्र काय राहणार याचा अंदाजही बांधता येतो. आता तेजा (Chilly Rate) मिरचीचे दरही तेजीत असल्याचे हंगामाच्या सुरवातीलाच स्पष्ट झाले आहे. कारण गतवर्षी सुरवातीला 2 हजार 300 रुपये क्विंटल असा दर होता. तर यंदा सुरावातीलाच 4 हजार 511 रुपये क्विंटल असा दर सिल्लोड तालुक्यातील आमठाणा बाजारपेठेत मिळाल आहे. शिवाय याप्रमाणेच दर कायम राहतील असा अंदाजही व्यापारी व्यक्त करीत आहे. त्यामुळे यंदा तेजाचा चांगलाच ठसका उडणार हे स्पष्ट झालंय.

आमठाणा बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना अंदाज

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा बाजारपेठ ही मिरचीसाठी प्रसिध्द आहे. याचे वेगळेपण म्हणजे हंगाम सुरु होण्यापूर्वीच या बाजारपेठेत मिरचीची आवक होण्यास सुरवात होते. यंदा तशीच काहीशी परस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून मिरची आवकला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी तेजा मिरचीला 4 हजार 511 रुपये क्विंटल असा दर मिळालाय. या विक्रमी दरामुळे यंदा तेजा फोर मिरचीचे काय मार्केट राहणार याचा अंदाज शेतकऱ्यांना बांधता येतो.गेल्या 10 वर्षापासून या बाजारपेठेत तेजाची आवक आणि दरही तेजीत आहेत.

शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय ?

निसर्गाच्या लहरीपणाचा समना करीत एप्रिल महिन्यात लागवड केलेली मिरची आता कुठे बाजारात दाखल होत आहे. मुख्य पिकांमधून तर शेतकऱ्यांचे नुकसान झालेलच आहे पण मिरचीचा तरी आधार मिळावा ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शिवाय असाच दर कायम रहावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. हंगामाच्या सुरवातीचा दर समाधानकारक असून भविष्यात आवक वाढली तरी हेच दर कायम राहिले तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत.

तर अधिकच्या शेतकऱ्यांना फायदा झाला असता

यंदा जूनचा पंधरवाडा उलटला तरी पावसाचे दमदार आगमन झालेले नाही. जर नियमितपणे 1 जून रोजी पावसाने हजेरी लावली असती तर मात्र, पुर्वहंगामी उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले असते. आता अनेक भागातील पुर्वहंगामी उत्पादन उशिराने शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे 4 हजार 511 रुपयेच दर मिळेल असे नाही. काही शेतकऱ्यांना कमी दरात मिरची विक्री करावी लागणार आहे.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!