AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

State Government: खरिपापूर्वीच बदलणार मदतीचे निकष, नुकसानभरपाईत नेमक्या त्रुटी काय?

निसर्गाचा लहरीपणा आणि शेती पिकांचे होणारे नुकसान हे आता नित्याचेच झाले आहे. असे असले तरी नुकसानभरपाईबाबत कोणतेही धोरण बदलत नाही. राज्यातील शेतकऱ्यांना एकतर महसूल आणि कृषी विभागाच्या पंचनाम्यानंतर आणि एनडीआरएफ च्या अहवालानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाते. मात्र, या मदतीचे निकषही पूर्वीचे आहेत. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना एकसमान मदत मिळतेच असे नाही. मात्र, एनडीआरएफ ही केंद्र सरकारची संस्था आहे.

State Government: खरिपापूर्वीच बदलणार मदतीचे निकष, नुकसानभरपाईत नेमक्या त्रुटी काय?
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Mar 23, 2022 | 10:10 AM
Share

मुंबई : निसर्गाचा लहरीपणा आणि शेती (Crop Damage) पिकांचे होणारे नुकसान हे आता नित्याचेच झाले आहे. असे असले तरी नुकसानभरपाईबाबत कोणतेही धोरण बदलत नाही. राज्यातील शेतकऱ्यांना एकतर महसूल आणि कृषी विभागाच्या पंचनाम्यानंतर आणि (NDRF) एनडीआरएफ च्या अहवालानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाते. मात्र, या मदतीचे निकषही पूर्वीचे आहेत. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना एकसमान मदत मिळतेच असे नाही. मात्र, एनडीआरएफ ही (Central Government) केंद्र सरकारची संस्था आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसारच शेतकऱ्यांना मदत केली जाते. यामध्ये राज्याचाही हिस्सा असतो मात्र, या वर्षीचा खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी मदतीचे निकष बदलण्यास पाठपुरावा केला जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या खरिपापासून दिलासा मिळणार का हे पहावे लागणार आहे.

ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पर्जन्यमापक

अचूक पर्जन्यमाप करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या स्तरावर पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याची घोषणा यापूर्वीच झाली असतानाही पूर्तता झालेली नाही. पण शेतकऱ्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. जर तीन दिवसांमध्ये 100 मिलीमिटर पेक्षा अधिक पाऊस झाला तर निकषांमध्ये त्याचा समावेश केला जाणार आहे. सध्या मंडळाच्या ठिकाणीच पर्जन्यामापक यंत्र आहेत. त्यामुळे योग्य ते निकष लावले जात नाही. परिणामी शिवारानिहाय मदतीमध्ये अनियमितता होत असल्याचे समोर आले आहे.

एनडीआरएफचे निकष भरपाईसाठी अडथळाच

नैसर्गिक संकटानंतर सर्वकाही निवाळल्यानंतर एनडीआरएफ चे पथक पाहणीसाठी शिवारात येते. मात्र, प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याची पाहणी होणे शक्य नाही. शिवाय या पथकाकडून झालेल्या पावसानुसार मदतीचे निकष लावले जात नाहीत.पाऊस किती आणि कसा झाला याची तपासणी न करताच मदतीची घोषणा केली जाते. शिवाय पर्जन्यामापक ही मंडळाच्या ठिकाणी आहेत. गावापासून 25 किलोमीटर अंतरावर असल्याने मदतीचे निकष कसे लावले जाणार असा सवाल देखील विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

पीकविमा नंतर नुकसानभरपाईबाबतचा निर्णय

केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा का नाही याबाबत यंदाच्या खरीप हंगामापूर्वीच निर्णय घेतला जाणार आहे. पीकविमा योजनेत असणाऱ्या विमा कंपन्या ह्या मनमानी कारभार करीत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या विमा योजनेतच कायम रहायचे की राज्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवायची याचा निर्णय खरीप हंगामापूर्वी घेतला जाणार आहे. यानंतर आता मदतीचे निकषही बदलले जाणार असून हे दोन्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहेत.

संबंधित बातम्या :

Rabi Season : लगबग सुगीची, शेतकऱ्यांचा कडधान्यावर भर, यंदा वाढणार ज्वारीचे दर..!

Chemical Fertilizer : रासायनिक खताने उत्पादनात वाढ, शेतजमिनीचे काय? कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Good News : मार्च अखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी, State Government चा निर्णय नेमका कुणासाठी?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.