AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, रब्बी हंगामाबाबत महत्वपूर्ण सल्ला

आता जो अंदाज वर्तवण्यात आला आहे तो शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. 8 नोव्हेंबरपासून हवामान हे कोरडे राहणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना चाढ्यावर मूठ धरायला पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे या आठवड्यात रब्बी हंगामाच्या रखडलेल्या पेरणी कामाला वेग येणार आहे. शिवाय दिवाळी सणही संपला असून आता बळीराजाची लगबग ही सुरु झाली आहे.

शेतकऱ्यांनो हीच 'ती' योग्य वेळ, रब्बी हंगामाबाबत महत्वपूर्ण सल्ला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 08, 2021 | 11:01 AM
Share

लातूर : हवामान विभागाने (weather experts advise farmers) अंदाज वर्तवला आणि तो ‘फेल’ ठरला असे या वर्षी घडलेच नाही. विशेष: पावसाबाबतचे अंदाज हे खरे ठरलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हे सतर्क राहिले आणि होणारे नुकसानही टळले आहे. (sowing conducive environment) आता दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर मराठवाड्यासह उत्तर महराष्ट्रात पावसाने हजेरी लावली होती. पण आता जो अंदाज वर्तवण्यात आला आहे तो शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. 8 नोव्हेंबरपासून हवामान हे कोरडे ( Weather dry) राहणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना चाढ्यावर मूठ धरायला पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे या आठवड्यात रब्बी हंगामाच्या रखडलेल्या पेरणी कामाला वेग येणार आहे. शिवाय दिवाळी सणही संपला असून आता बळीराजाची लगबग ही सुरु झाली आहे.

खरिपात झालेल्या पावसामुळे यंदा रब्बीचा हंगाम हा तब्बल महिन्याने लांबणीवर पडलेला आहे. शिवाय ऐन दिवाळीतच अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्येच भरच पडली होती. पण आजपासून (सोमवार) हवामान हे कोरडे राहणार असून वाफसा झालेल्या क्षेत्रावर पेरणी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. शिवाय गेल्या वर्षभरापासून डख यांनी वर्तवलेल्या अंदाजाचा फायदा केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झालेला आहे.

12 टक्केच रब्बीच्या पेरण्या

यंदा अधिकच्या पावसाचा परिणाम हा दुरगामी पाहवयास मिळालेला आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच पण रब्बी हंगामातील कामेही वेळेत आटोपता आलेली नाहीत. पावसामुळे शेत जमिनी ह्या चिभडलेल्या होत्या तर मशागत करुन पेरणीच्या तयारीत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आतापर्यंत राज्यात सरासरीच्या केवळ 12 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ज्या भागात पेरणीनंतर पाऊस झाला त्या मराठवाड्यात आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. कारण अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पेरलेली ज्वारी ही जळून जाते व तिच्या वाढीवर परिणाम होतो म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बीच्या दुबार पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे.

हरभरा, गव्हासाठी पोषक वातावरण

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आता कोरडे वातावरण राहणार असून थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आतापर्यंत गव्हाचा सर्वात कमी पेरा झाला आहे. अवकाळी पाऊस आणि चिभडलेली शेतजमिन यामुळे शेतकरी पोषक वातावरणाची वाट पाहत होते. अखेर आता पेरणीसाठी पोषक वातावरण झाले असून पेरणीचा टक्का वाढेल अशी अपेक्षा कृषी विभाग बाळगत आहे. हरभरा आणि गव्हाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या थंडीतही वाढ होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात वेगळेच चित्र निर्माण होईल असा अंदाज आहे.

पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

8 नोव्हेंबरपासून कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे रब्बीच्या रखडलेल्या पेरण्यांसाठी हेच पोषक वातावरण आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत असेच कोरडे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळ खर्ची न करता चाढ्यावर मूठ ठेवणे आवश्यक आहे. सोमवारपासून 5 दिवस वातावरण कोरडे राहणार आहे. त्यानंतर मात्र, पुन्हा चक्रीवादळाचा धोका कायम आहे. यंदा दर 10 ते 15 दिवसांनी चक्रीवादळाचा धोका राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत कामे उरकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बीजप्रक्रिया महत्वाचीच

बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणीच करु नये दरवर्षी शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पेरणीला सुरवात करतात. पण यंदा बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी लागणार आहे. म्हणेज रासायनिक खताची मिसळण किंवा जैविक पध्दतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो. शिवाय यंदा अधिकच्या पावसामुळे जमिनीत पाणी आहे. त्यामुळे जमिनीत बुरशीचेही प्रमाण असणार आहे. यापासून पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्वाची आहे.

संबंधित बातम्या :

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात

आणेवारी सुधारली, शेतकऱ्यांची चिंता वाढली, यवतमाळ जिल्ह्याबाबत महसूल विभागाचा अहवाल

दुष्काळात तेरावा ; अवकाळी पावसामुळे लागवडीपूर्वीच कांद्याचा ‘वांदा’

Follow Us
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा