कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

कांदा 50 ते 60 रुपये किलो रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार असल्याचं दिसतंय. Onion rates hike

कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?
Onion Rate cheaper
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 12:59 PM

नवी मुंबई: राज्यातील प्रमुख बाजार समिती म्हणून नवी मुंबई बाजार समितीची ओळख आहे. नवी मुंबई बाजारसमितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये 23400 गोणी कांद्यांची आवक झालीय. सध्या कांद्याचे दर वाढत असून मागील आठवड्यापेक्षा कांद्याचे दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा चाळीस रुपये प्रति किलो आहे. तर, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने कांदा 50 ते 60 रुपये किलो रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार असल्याचं दिसतंय. (Onion rates hike in Maharashtra APMC Markets)

अवकाळी अतिवृष्टीमुळे पुणे आणि नाशिक परिसरातील कांदा शेतकरी चिंतेत

राज्यातील नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतलं जातं. पण, सप्टेंबर आक्टोंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं. पुणे आणि नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर, या परिसरात थंडी वाढल्याने कांदा पिके चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

किरकोळ बाजारात कांदा पन्नाशीच्या वर

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केट मध्ये जवळपास 23400 गोणी कांद्याची आवक झाली आहे. तर मागील आठवड्यापेक्षा कांद्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा 40 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतोय. तर, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने कांदा 50 ते 60 रुपये दराने विकला जात आहे.

नवीन कांदा पूर्ण क्षमतेने सुरु होई पर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार

नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली असून पूर्ण क्षमतेने कांदा सुरु होईपर्यंत कांद्याचे दर चढे राहणार आहेत. कांदा व्यापारी सुरेश शिंदे यांनी ही माहिती दिली.

राज्यभर कांद्याची आवक घसरली

अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला असून राज्यभर कांद्याची आवक घसरू लागली आहे. मुंबईतही आवक कमी होत असून दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा 38 ते 42 रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे. राज्यात वर्षभरापासून कांदा दरामध्ये वारंवार चढउतार होऊ लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होऊ लागली आहे. राज्यात बहुतांश सर्वच बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे.

संबंधित बातम्या:

वांगी आणि टोमॅटो एकाच झाडाला लागलेलं पाहिलंय का? अजब संशोधनाची सर्वत्र चर्चा

अकोल्याच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, बाजारपेठेत जास्त भाव, चांगल्या उत्पन्नाची आशा

(Onion rates hike in Maharashtra APMC markets)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.