AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

कांदा 50 ते 60 रुपये किलो रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार असल्याचं दिसतंय. Onion rates hike

कांद्यांनं पन्नाशी ओलांडली, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?
Onion Rate cheaper
| Updated on: Feb 11, 2021 | 12:59 PM
Share

नवी मुंबई: राज्यातील प्रमुख बाजार समिती म्हणून नवी मुंबई बाजार समितीची ओळख आहे. नवी मुंबई बाजारसमितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये 23400 गोणी कांद्यांची आवक झालीय. सध्या कांद्याचे दर वाढत असून मागील आठवड्यापेक्षा कांद्याचे दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा चाळीस रुपये प्रति किलो आहे. तर, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने कांदा 50 ते 60 रुपये किलो रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार असल्याचं दिसतंय. (Onion rates hike in Maharashtra APMC Markets)

अवकाळी अतिवृष्टीमुळे पुणे आणि नाशिक परिसरातील कांदा शेतकरी चिंतेत

राज्यातील नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतलं जातं. पण, सप्टेंबर आक्टोंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं. पुणे आणि नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर, या परिसरात थंडी वाढल्याने कांदा पिके चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

किरकोळ बाजारात कांदा पन्नाशीच्या वर

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केट मध्ये जवळपास 23400 गोणी कांद्याची आवक झाली आहे. तर मागील आठवड्यापेक्षा कांद्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा 40 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतोय. तर, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने कांदा 50 ते 60 रुपये दराने विकला जात आहे.

नवीन कांदा पूर्ण क्षमतेने सुरु होई पर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार

नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली असून पूर्ण क्षमतेने कांदा सुरु होईपर्यंत कांद्याचे दर चढे राहणार आहेत. कांदा व्यापारी सुरेश शिंदे यांनी ही माहिती दिली.

राज्यभर कांद्याची आवक घसरली

अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला असून राज्यभर कांद्याची आवक घसरू लागली आहे. मुंबईतही आवक कमी होत असून दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा 38 ते 42 रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी ओलांडली आहे. राज्यात वर्षभरापासून कांदा दरामध्ये वारंवार चढउतार होऊ लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होऊ लागली आहे. राज्यात बहुतांश सर्वच बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे.

संबंधित बातम्या:

वांगी आणि टोमॅटो एकाच झाडाला लागलेलं पाहिलंय का? अजब संशोधनाची सर्वत्र चर्चा

अकोल्याच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, बाजारपेठेत जास्त भाव, चांगल्या उत्पन्नाची आशा

(Onion rates hike in Maharashtra APMC markets)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.