AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले

तब्बल 105 दिवसांनतर निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात 360 रुपयांची वाढ झाली आहे. (Onion prices export ban)

सरकारने बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले
Onion Rate cheaper
| Updated on: Dec 29, 2020 | 12:20 PM
Share

नाशिक : तब्बल 105 दिवसांनतर निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात 360 रुपयांची वाढ झाली आहे. निर्यातबंदी उठवल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Onion prices rises due to lifting of export ban)

कांद्याचे भाव वाढल्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यांनतर आता येत्या 1 जानेवारीपासून ही निर्यातबंदी उठवण्याचा केंद्र सराकरने निर्णय घेतला आहे. सरकारच्या याच निर्णयाचा परिणाम लालसलगाव येथील बाजारसमितीमध्ये पाहायला मिळाला. या निर्णयामुळे कांद्यांच्या भावात मोठी वाढ झाली. लासलगावमध्ये कांद्याचा भाव सध्या 360 रुपयांनी वाढला आहे.

कांदा निर्यातबंदी उठवण्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. अडीच महिन्यांनतर कांद्याचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. तर सामान्य नागरिकांना या भाववाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. लासलगाव येथील बाजारामध्ये कांद्याचा कमाल भाव प्रतिक्विंटल 2372 रुपये असून किमान भाव 1000 रुपये आहे .तर सर्वसाधारण भाव प्रतिक्विंटलमागे 2100 रुपये ईतका आहे.

निर्यातबंदीमुळे कांद्याच्या लिलाव बंद

दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून कांदा निर्यातीवर बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात लासलगाव तसेच राज्यभरातून आंदोलनं होत होती. लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडून लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद केला होता. शेतकऱ्यांच्या या पवित्र्यामुळे बाजारात कांदा पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यांनतर येत्या 1 जानेवारीपासून कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतऱ्यांना आंततराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे चांगला पैसा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज कांद्याचा भाव 360 रुपयांनी वाढल्यामुळे सामान्यांना याचा फटका बसू शकतो, असे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

मोदींच्या मन की बातमधली केसरची शेती कशी देते लाखो कमाईची संधी?

29 डिसेंबरच्या बैठकीला शेतकरी तयार, मात्र सरकारसमोर ‘या’ अटी

रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल

(Onion prices rises due to lifting of export ban)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.