AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल

द्राक्षाचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वृत्तपत्र रद्दी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल
| Updated on: Dec 26, 2020 | 2:17 PM
Share

नाशिक : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षांना (Grape Farmers Having Trouble Due To Newspaper Junk Price Hike) वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे हुडहुडी भरली आहे. कोरोना महामारीचा फटका वृत्तपत्र व्यवसायालाही बसल्याने त्याचा थेट परिणाम वृत्तपत्रांच्या रद्दीवर झाला आहे. वृत्तपत्र रद्दीच्या दरात तिपटीने वाढ होऊनही रद्दी उपलब्ध होत नसल्याने द्राक्ष निर्यातदार शेतकरी हतबल झाले आहे (Grape Farmers Having Trouble Due To Newspaper Junk Price Hike).

द्राक्षाचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वृत्तपत्र रद्दी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी द्राक्ष हंगामामध्ये 18 ते 20 रुपये प्रति किलो विक्री होणारी रद्दी आता 45 ते 50 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. रद्दीच्या भावात तीन पट वाढ झाली असून पैसे देऊनही रद्दी मिळत नसल्याने ‘रद्दी देता का रद्दी’ अशी म्हणण्याची वेळ प्रथमच शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरोनामुळे अनेक दिवस वृत्तपत्र छपाई न झाल्याने त्याचा थेट परिणाम रद्दीवर झालेला आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभवतो, अशी अफवा सोशल मीडियाव्दारे पसरवण्यात आली होती. याचा एकूणच परिणाम वृत्तपत्र छपाई आणि खपावर झाला होता.

निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आणि व्यापारी यांच्याकडून वृत्तपत्र रद्दीला मोठी मागणी आहे. निर्यातक्षम द्राक्ष घडाचे उन्हापासून आणि धुळीपासून सरंक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक द्राक्ष घडा भोवती वृत्तपत्राचा कागद गुंडाळतात. घडांच्या संख्येनुसार द्राक्ष बागेला एकरी 400 ते 500 किलोग्रॅम रद्दीची गरज असते. रद्दीच्या भावात तीन पट वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांचा खर्च वाढला आहे.

Grape Farmers Having Trouble Due To Newspaper Junk Price Hike

संबंधित बातम्या :

नोकरीला रामराम करतं माढ्यातील शिरसट दाम्पत्यानं पोल्ट्री व्यवसायात करुन दाखवलं

किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नसतील तर आजच करा ‘या’ गोष्टी

लय भारी! शेतकऱ्यांसाठी एमओएफएसने दिली ‘ही’ खूश खबर!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.