AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara : धक्कादायक..! मुबलक पाणी असतानाही उन्हाळी पिकांनी माना टाकल्या, जमिनीलाही भेगा पडल्या, कारण काय?

विदर्भात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे एक दिवसआड उन्हाळी पिकांना पाणी दिले तरच अपेक्षित उत्पादन मिळणार आहे. भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्याच्या रखरखत्या उन्हामध्ये एकवेळ पाणी देण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली तरी पिके माना टाकतात. हे सर्व माहिती असतानाही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दिवसाकाठी केवळ 2 तास विद्युत पुरवठा करण्याची आडमुठी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

Bhandara : धक्कादायक..! मुबलक पाणी असतानाही उन्हाळी पिकांनी माना टाकल्या, जमिनीलाही भेगा पडल्या, कारण काय?
भंडारा जिल्ह्यात कृषीपंपासाठी केवळ 2 तास विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतमजमिनीला अशा भेगा पडल्या आहेत.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 10:05 AM
Share

भंडारा : विदर्भात दिवसेंदिवस (Temperature Increase) उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे एक दिवसआड  उन्हाळी पिकांना पाणी दिले तरच अपेक्षित उत्पादन मिळणार आहे. भंडारा जिल्हा (Paddy Crop) धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्याच्या रखरखत्या उन्हामध्ये एकवेळ पाणी देण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली तरी पिके माना टाकतात. हे सर्व माहिती असतानाही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दिवसाकाठी केवळ 2 तास (Agricultural Pump) विद्युत पुरवठा करण्याची आडमुठी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मोहडी तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून अशी परस्थिती ओढावली आहे. खरिपातील पिके अवकाळीने हिरावली आणि आता महावितरणचा कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. दोन तासांमध्ये पाठतले पाणी पिकांपर्यंत पोहचेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे.

शेती पिकाचे नुकसान, शेत जमिनीलाही भेगा

भंडारा जिल्ह्या हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोहाडी तालुक्यातील मुढरी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पीक, भाजीपाला, ऊस लागवड केली आहे. सध्या उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार झाल्याने शेतीला मुबलक पाणी पाहिजे. अशा परस्थितीमध्येच विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे कृषी पंपासाठी केवळ 2 तास वीज दिली जात आहे. आधीच उन्हामुळे जमिनीवर भेगा पडल्या असल्याने 2 तासात अर्धी बांधी देखील ओली होत नाही. यामुळे पाणी मुबलक असतानाही लागवड केलेलं पीक करपू लागले आहे. शेतात भेगा पडल्या आहेत.

विजबील भरणा करुनही महावितरणचा ‘शॉक’

मध्यंतरी कृषी पंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. उत्पादनात घट आणि निसर्गाचा लहरीपणा यामध्ये शेतकरी त्रस्त असतानाही शेतकऱ्यांनी थकीत विजबील भरणा केला. त्यामुळे किमान 8 तास तरी सुरळीत विद्युत पुरवठा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण मोहाडी तालुक्यात केवळ दोन तास विद्युत पुरवठा करुन प्रशासनाने जगाचा पोशिंद्याचे चेष्टाच लावली आहे. या गलथान कारभाराचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे.

मुबलक पाणी असतानाही उत्पादनात घट

एकीकडे शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. पण अजूनही शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा देखील मिळाल्या नाहीत. शेतीसाठी नियमित वीज दिली जात नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शिवाराला लागूनच असलेल्या साखर कारखान्यांना मात्र, 24 तास विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सरकारची धोरणे नेमकी कुणासाठी असा सवाल उपस्थित आहे. उन्हाळी हंगामातील उत्पादन घटण्यामागे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Onion Crop : आवक घटूनही कांद्याचा वांदाच, खरिपात साधले उन्हाळी कांद्याचे गणितच बिघडले

Income Tax | श्रीमंत शेतकरी प्राप्तीकर विभागाच्या रडारवर; उत्पन्न जास्त असेल तर कर भरावा लागणार?

State Government: आता मागूनही मिळणार नाही शेततळे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.