AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural : पिकांवरील संकट टळले आता जनावरांना धोका, ‘लम्पी’ रोगाने पुन्हा डोके वर काढले..! नेमकी उपाययोजना काय?

सर्वात प्रथम लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे. गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होणार नाही. तसेच मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस ही उपलब्ध आहे.

Agricultural : पिकांवरील संकट टळले आता जनावरांना धोका, 'लम्पी' रोगाने पुन्हा डोके वर काढले..! नेमकी उपाययोजना काय?
लम्पी संसर्गजन्य आजार
| Updated on: Sep 01, 2022 | 3:31 PM
Share

वाशिम : हंगामाच्या सुरवातीपासूनच (Kharif Season) खरिपातील पिके धोक्यात आहेत. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ होत आहे. त्यामुळे खरिपावरील संकट टळले असले तरी राज्यातील अहमदनगर, जळगाव, धुळे, अकोला पाठोपाठ आता वाशिम जिल्ह्यामध्येही जनावरांना (Outbreak of Lumpy Disease) लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुशंगाने (Department of Animal Husbandry) पशुसंवर्धन विभागाकडून उपापययोजना राबवण्यास सुरवात झाली आहे. मात्र, ‘लम्पी’ हा संसर्गजन्य रोग असल्याने कमी कालावधीत अधिक जनावरांना त्याची लागण होते. यामुळे (Animal) जनावरे दगावली जात नाही पण रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती उपाययोजना ही गरजेची आहे. याबरोबरच गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या पालघरमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. लम्पी त्वचा रोग जनावरातील विषाणूजन्य आजार आहे.

लम्पी रोगाची लक्षणे अन् परिणाम काय?

लम्पी हा एक त्वचा रोग असून त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. जनावरांना लम्पी रोग होण्याचे कारणही तसेच आहे. जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण होते. यामुळे जनावरास ताप येतो तर जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे लसीकरण हा उत्तम पर्याय असून पशूसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभाग नोदवून लस देणे गरजेचे आहे.

काय आहे उपाययोजना?

सर्वात प्रथम लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे. गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होणार नाही. तसेच मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस ही उपलब्ध आहे. शेतरकऱ्यांना कोणत्याही कादगत्राशिवाय मोफत ही लस दिली जाते. गोठ्यामध्ये माशा, गोमाश्या, गोचिड हे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय एखाद्या जनावरास हा आजार झाल्यास सुमारे 5 किमीपर्यंत लसीकरण मोहिम राबवली जाते. त्यासाठी पशूसंवर्धन विभागाला माहिती देणे गरजेचे आहे.

या जिल्ह्यांमध्ये वाढला धोका

लम्पी रोगाचा धोका हा पावसाळ्यातच वाढतो. या दरम्यानच्या काळात जनावरांचे गोठे अस्वच्छ असतात. शिवाय सततच्या पावसामुळे ते स्वच्छ करणेही शक्य होत नाही. त्यामुळे सध्या या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. विशेषत: अहमदनगर, जळगाव, धुळे व अकोला या जिल्ह्यात पाळीव जनावरांना लम्पी स्कीन डिसीसचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर पालघर जिल्ह्यामध्येही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावराच्या गोठ्यात 20 टक्के इथर व क्लोरोफार्म, 1 टक्के फॉर्मलिन, 2 टक्के फिनॉल, आयोडिन जंतनाशके 1:3 प्रमाणात पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्यात यावी असल्या सूचना पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.