AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : तीन एकरामध्ये केळी लागवड केली पण उत्पादन पदरात पडण्यापूर्वीच उपटून बांधावर फेकली,नेमके कारण काय?

उत्पादनात घाटा झाला तर ठीक, पण गोकुळ पाटील यांना उत्पादन पदरात पडण्यापूर्वीच लाखोंचा फटका बसला आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी केळी लागवड करुन येथील पोषक वातावरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केळी पिकाच्या बाबतीत अडचणी ह्या वाढत आहेत. पाटील यांनी तर केळीच्या लागवड करताच ठिंबक सिंचन, सरी पद्धत आणि लागवडीसाठी असा लाखोंचा खर्च केला होता, पण लागवडीनंतर अवघ्या काही महिन्यात त्यांना ही रोपे काढावी लागली आहेत.

Jalgaon : तीन एकरामध्ये केळी लागवड केली पण उत्पादन पदरात पडण्यापूर्वीच उपटून बांधावर फेकली,नेमके कारण काय?
रोगराईमुळे 3 एकरामध्ये लागवड केलेली केळी उपटून फेकावी लागली आहेत.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 30, 2022 | 7:37 PM
Share

जळगाव : जळगावची (Banana) केळी ही केवळ राज्यातच नाहीतर सबंध देशभरात प्रसिद्ध आहे. केळीची चव आणि उत्पादन यामुळे अनेक शेतकरी हे सधनही झाले आहेत. शिवाय मध्यंतरी केळीला फळाचा दर्जा दिल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. पण निसर्गाचा लहरीपणा आणि (Increasing prevalence of disease) रोगराईचा वाढता प्रदुर्भाव पाहता केळी उत्पादक हा संकटाक सापडलेला आहे. सलग दोन वर्ष अतिवृष्टी आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा सामना हा केळी उत्पादकांना करावा लागला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा तर (Banana Plants) केळीची रोपे थेट उपटून बांधावर फेकली जात आहेत. केळीची लागवड करताच सी. एम. व्ही. (ककुम्बर मोझॅक व्हायरस) रोगचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेड येथील शेतकरी गोकुळ धनु पाटील यांनी तीन एकरातील 4 हजार रोपे ही काढून बांधावर फेकली आहेत.

केळीच्या रोपांवर सी.एम.व्ही चा प्रादुर्भाव

केळीच्या रोपांची लागवड करतानाच ती निरोगी असणे गरजेचे आहे. अन्यथा व्हायरससारखे पिकांवर येणारे आजार हे आटोक्यात येणार नाहीत. त्यामुळे केळीची लागवड करतानाच रोपे ही रोगमुक्त आणि निरोगी असणे गरजेचे आहे. बेलखेड येथील शेतकरी गोकुळ धनु पाटील यांनी तब्बल 4 केळीची रोपे विकत आणली. लागवड होताच या रोपांवर एक विशिष्ट डाग आढळून आला. त्यामुळे वाढही खुंटली आणि भविष्यात याला फळधारणाही होणार नाही असे चित्र होते. त्यामुळे त्यांनी तीन एकरातील 4 हजार केळीची रोप उपटून थेट बांधावर फेकली.

उत्पादनाविना लाखोंचा खर्च

उत्पादनात घाटा झाला तर ठीक, पण गोकुळ पाटील यांना उत्पादन पदरात पडण्यापूर्वीच लाखोंचा फटका बसला आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी केळी लागवड करुन येथील पोषक वातावरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केळी पिकाच्या बाबतीत अडचणी ह्या वाढत आहेत. पाटील यांनी तर केळीच्या लागवड करताच ठिंबक सिंचन, सरी पद्धत आणि लागवडीसाठी असा लाखोंचा खर्च केला होता, पण लागवडीनंतर अवघ्या काही महिन्यात त्यांना ही रोपे काढावी लागली आहेत.

सी एम व्ही (ककुम्बर मोझॅक व्हायरस) रोगामुळे शेतकरी त्रस्त

काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये बदल होत असला तरी वातावरणानुसार रोगराईचाही प्रादुर्भाव हा वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात केळीच्या रोपांवर सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एखाद्यावेळी शेतकऱ्याने सीएमव्ही रोगाने बाधित झालेल्या झाडाचा कंद काढून कळत न कळतपणे लावला तर व्हायरस येऊ शकतो. टिश्यूकल्चरच्या रोपांमधून या व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....