AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape : निसर्गाच्या लहरीपणावर मात करुनही द्राक्ष उत्पादक अडचणीतच, निर्यातीवरही परिणाम..!

अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ वातावरण हे कमी म्हणून की काय रोगराईचा प्रादुर्भाव या सर्व संकटावर शेतकऱ्यांनी मात करुन द्राक्षाचे पीक पदरात पाडून घेतले. त्यामुळे आता संकट टळले असे तुम्हाला वाटत असेल पण, तसे नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही कायमच आहेत. द्राक्ष बागा ऐन बहरात असताना झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 26 हजार एकरावरील बागांचे नुकसान झाले होते.

Grape : निसर्गाच्या लहरीपणावर मात करुनही द्राक्ष उत्पादक अडचणीतच, निर्यातीवरही परिणाम..!
द्राक्षाची निर्यात सुरु आहे पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
| Updated on: Mar 05, 2022 | 5:06 AM
Share

नाशिक : अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ वातावरण हे कमी म्हणून की काय रोगराईचा प्रादुर्भाव या सर्व संकटावर शेतकऱ्यांनी मात करुन (Grape Production) द्राक्ष पदरात पाडून घेतले. त्यामुळे आता संकट टळले असे तुम्हाला वाटत असेल पण, तसे नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही कायमच आहेत. (Vineyard) द्राक्ष बागा ऐन बहरात असताना झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 26 हजार एकरावरील (Grape Damage) बागांचे नुकसान झाले होते. त्याच्या झळा अजून कायम आहेत. द्राक्ष काढणीस तयार झाले आहे मात्र, दर्जा चांगला नसल्याने मागणी नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना किलोमागे 10 रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी अधिकचा खर्च करुनही शेवटी पदरी काय ? हा सवाल कायम आहेच. हंगामाची सुरवात तर अशी झाली आहे भविष्यात काय होईल याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

बे-भाव कंमतीमध्ये द्राक्षाची मागणी

द्राक्ष हे हंगामी पीक आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच जी द्राक्षे बाजार पेठेत दाखल होतात. त्याला अधिकची मागणी असते. यंदा मात्र, तसे चित्र नाही. मालाची मागणी करतानाच व्यापारी हे दर पाडून मागत आहेत. दर्जात्मक द्राक्ष नाहीत बाऊ झाला आहे. अवकाळीनंतर वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षाला रंग चढलेला नाही तर फुगवण व साखर उतारण्याच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. आता ही सर्व प्रक्रिया पार पडली तर व्यापाऱ्यांकडून केवळ 15 ते 20 रुपये किलोने मागणी होत आहे. त्यामुळे उत्पादनावर खर्च अधिकचे अन् उत्पन्न कमी अशी अवस्था झाली आहे.

काय आहेत सध्याचे फडावरचे वास्तव?

सध्या द्राक्षाची तोडणी अंतिम टप्प्यात आहे. उत्पादनावर झालेला खर्च आणि वर्षभराची मेहनत पाहता स्थानिक पातळीवर विक्री केली जाणाऱ्या द्राक्षाला 18ते 20 रुपये किलोचा दर मिळत आहे. तर निर्यात केले जाणारे द्राक्ष हे वेगळ्या दर्जाचे असतात. निर्यातक्षम द्राक्षाला सध्या 50 ते 75 रुपये किलोचा दर आहे. तर शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की, स्थानिक पातळीवर 30 ते 50 दर अपेक्षित आहे तर निर्यात होणाऱ्या द्राक्षाला 60 ते 85 रुपये किलोचा दर मिळावा ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आतापर्यंत उत्पादनात घट होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना नियोजन करावे लागले होते पण दराचे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हंगामातील सध्याची काय आहे स्थिती?

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून निघेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता.सध्या द्राक्षाची मागणी असली तरी सफेद द्राक्षापेक्षा रंग चढलेल्या द्राक्षाला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. द्राक्षाची गुणवत्ता चांगली असली तरच निर्यातीचा मार्ग खुला आहे. अन्यथा कमी दरात स्थानिक पातळीवरच द्राक्ष विक्री करण्याची नामुष्की ओढावत आहे. गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे 10 रुपयांनी कमी दर मिळत आहे.

संबंधित बातम्या :

युट्यूब पाहून अफू पिकवला, पोलिसांची थेट बांधावरच धाड; वाळकी शिवारात नेमके काय घडले?

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पिकांवरील रोगांचे मूळ कारण काय? जाणून घ्या उपाययोजनाही

Beed : केज कृषी उत्पन्न बाजार समतीवर अखेर प्रशासक, कारणही क्षुल्लक

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.