AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यासाठी महत्वपूर्ण माहीती, तर मिळेल मासिक पेन्शनही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एका वर्षात आणि तीन टप्प्यामध्ये देण्यात येतात. त्याच अनुशंगाने पीएम किसान मानधन योजनाही आहे. यामध्ये शेतकऱ्याला मासिक पेन्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यासाठी महत्वपूर्ण माहीती, तर मिळेल मासिक पेन्शनही
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 6:23 PM
Share

मुंबई : देशातील 10 कोटीहून अधिक शेतकरी हे (PM Kisan Yojna) पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जात आहेत. ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असली तरी यापलिकेडे जाऊन आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत ती पीएम किसान मानधन योजनेची.. अनेक शेतकरी (Farmer) यामध्ये सहभागी असतीलही मात्र, ज्यांना नव्याने सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एका वर्षात आणि तीन टप्प्यामध्ये देण्यात येतात. त्याच अनुशंगाने पीएम किसान मानधन योजनाही आहे. यामध्ये शेतकऱ्याला मासिक पेन्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभार्थी असलेल्या खातेदार शेतकऱ्याला पीएम किसान मानधन योजनेचा मान मिळणार आहे. या माध्यमातून मासिक पेन्शनचीही सुविधा मिळणार आहे. जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असताल तर कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्ही यामध्ये सहभाग नोंदवू शकणार आहात.

काय असणार आहेत अटी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून तीन महिन्यातून एकदा दोन हजार रुपये हे खातेदार शेतकऱ्याला देऊन केंद्र सरकार सन्मान करी आहे. याशिवाय पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन ची तरतूद आहे. याकरिता कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षाचे कोणतेही शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ होईल.

असे आहे योजनेचे स्वरुप

शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रतिमहिना ज्या प्रमाणात गुंतवणुक केली जाईल त्यानुसार वयाच्या 60 वर्षानंतर किमान तीन हजार रुपये किंवा वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळेल. यासाठी प्रतिमहिना गुंतवणूक पंचावन्न रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. पी एम किसान योजनेचे खातेदार जर पीएम किसान मानधन योजना सहभागी झाले त्यांची नोंदणी सहज होते. शिवाय पेन्शन योजनेमध्ये भरावे लागणारे पैसे हे तुमच्या खिशातून गुंतवावे लागत नाही तर ते एम किसान सन्मान निधी च्या योजनेच्या खात्यामधून कपात होतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 55 आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये गुंतवावे लागतात. (Pm Kisan Yojana beneficiaries to get monthly pension)

संबंधित बातम्या :

लातूर मार्केट : उडीदाच्या दरात पुन्हा वाढ, सोयाबीनचे दर स्थिर

केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे

उस्मानाबाद : खरीप उत्पादनाच्या आशा संपुष्टात, प्रकल्पातील पाणीही शेतातच

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.