AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी, व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा, यंदा तरी निघणार का तोडगा ?

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षे उत्पादन घेतले जाते. शिवाय किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांना निर्यातीचीही सेवा दिली जाते. मात्र, त्या तुलनेत मध्य रेल्वेकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ही तफावत राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी, व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा, यंदा तरी निघणार का तोडगा ?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 3:42 PM
Share

नाशिक : द्राक्ष उत्पादनावर यंदा बदलत्या वातावरणाचा आणि अवकाळी पावसाचा परिणाम हा झालेलाच आहे. मात्र, घटत्या उत्पादनामुळे निर्यात केलेल्या द्राक्षाला अधिकचा दर मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षे उत्पादन घेतले जाते. शिवाय किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांना निर्यातीचीही सेवा दिली जाते. मात्र, त्या तुलनेत मध्य रेल्वेकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ही तफावत राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

नाशिक जिल्ह्यातून बांग्लादेशात द्राक्षे निर्यात केली जातात. या देशात द्राक्ष पुरवण्यासाठी 20 ते 25 बोग्यांची आणि 10 टन क्षमतेची फॅनसुविधा असलेली उपलब्ध करुन द्यावी तसेच मार्च महिन्यापासून एसी रेल्वे देण्याची मागणी व्यापऱ्यांनी केली आहे.

रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक शेतकऱ्यांच्या हीताची

द्राक्ष ही ट्रकऐवजी रेल्वेने बांग्लादेशात पाठविण्यात आला तर कमी वेळेत, सुरक्षित तसेच त्याच्या दर्जावर काहीही परिणाम होणार नाही अशा पध्दतीने पुरवठा होणार आहे. 24 तासाच्या आतमध्ये माल बाजारपेठेत दाखल झाला तर किंमतही योग्य मिळते. ट्रकच्या माध्यमातून वाहतूक केल्यास बाजारपेठेत पोहचण्यास उशिर होतो. त्याचा परिणाम दरावर आणि सर्वच घटकांवर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुशंगाने ह्या मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत.

काय झाले बैठकीत?

द्राक्ष निर्यातीच्या अनुशंगाने बागायतदार संघ व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली आहे. बांग्लादेशातील निर्यात कशी महत्वाची आहे यावर चर्चा करण्यात आली. सफेद द्राक्षाला बांग्लादेशात प्रतिकिलो 50 ते 55 रुपये तर काळ्या द्राक्षाला 60 ते 65 रुपये अशी ड्यूटी लागते. यामध्ये निम्म्याने कमी करुन सर्वच द्राक्षमालावर एकसारखी ड्यूटी लावण्याची मागणी होत आहे. बांग्लादेशात पोहचणाऱ्या रेल्वला किमान 30 ते 32 तास लागतात. त्यामुळे बाजारपेठेच्या वेळेत ही रेल्वे बांग्लादेशातील मालदा येथे पोहचवण्याचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

द्राक्ष बागांवर अवकाळीचे सावट

सध्या वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुर्वहंगामी द्राक्ष उत्पादक हे अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. मध्यंतरी द्राक्ष उत्पादन क्षेत्रातच पावसाने हजेरी लावली होती तर आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

संबंधित बातम्या :

… तरच मिटेल कांद्याचा वांदा, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काय आहे मागणी?

काय सांगता ? ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर, शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?

वीजबिले अंदाजेच : वापर कमी अन् बिले अवास्तव, काय आहे बांधावरचे वास्तव?

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.