AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता ? ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर, शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?

दोन दिवसांपासून बाजारातले चित्र काही वेगळेच आहे. कारण दोन दिवसांमध्ये 400 रुपयांनी सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत.

काय सांगता ? ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर, शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 2:12 PM
Share

लातूर : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होत किंवा ते स्थिर राहत होते. पण दोन दिवसांपासून बाजारातले चित्र काही वेगळेच आहे. कारण दोन दिवसांमध्ये 400 रुपयांनी सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर होत अललेल्या बदलाचा परिणाम थेट बाजार समितीमधील सोयाबीनच्या दरावर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.

दिवाळीनंतर एकदाही सोयाबीनच्या दरात घट झाली नव्हती. एकतर दरात वाढ किंवा स्थिरता हे दोनच प्रकार होत होते. पण या आठवड्याची सुरवात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी झाली आहे. त्यामुळे आता तरी सोयाबीनची आवक वाढणार का हे पहावे लागणार आहे.

दर घटण्यामागे अनेक कारणे

सोयाबीनचे दर हे वाढत होते तर आवक ही मर्यादितच होती. मात्र, सोमवारपासून चित्र बदलू लागले आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये तब्बल 400 रुपयांनी दर हे घसरलेले आहेत. यामध्ये सोयापेंडची घटती मागणी, कोमोडिटी बाजारात झालेली घसरण आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातावर येत असलेली बंधने ही कारणे समोर येत आहेत. कारणे कोणतीही असो आता शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे. एका महिन्यात दीड हजाराने सोयाबीनचे भाव वाढले तर दोन दिवसांमध्ये 400 रुपयांनी घसरलेले आहेत.

शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

यंदाच्या हंगामात सोयाबीन दराचा परिणाम आवकवर केव्हाच झाला नव्हता. दर वाढले तरी आवक ही कमीच होती आणि दर कमी झाले तरी आवक ही वाढलेली नव्हती. सोयाबीनच्या वाढीव दराबाबत शेतकऱ्यांना विश्वास होता. त्यानुसार दर वाढलेही. मात्र, सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण ते प्रत्यक्षात होईल का नाही याबाबत सांगता येत नाही. पण अधिकच्या अपेक्षेत आहे ते हातून जायचे एवढे लक्षात ठेऊन सोयाबीनची विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसानही होऊ शकते असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.

तरीही आवक कमीच

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर वेळी सोयाबीनची आवक ही 10 ते 15 हजार पोत्यांची असते तर हंगाम सुरु झाला की ही आवक 40 ते 60 हजार पोत्यांवर जाते. यंदा मात्र, एकदाही सरासरी एवढी आवक झालेली नाही. शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता. दरवाढीने त्यांचा उद्देशही साध्य झाला आहे. मात्र, आता अधिकची अपेक्षा केली तर काय सांगता येत नाही. कारण सोयाबीन बाबत यंदा सर्वकाही अनपेक्षितच घड़त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

वीजबिले अंदाजेच : वापर कमी अन् बिले अवास्तव, काय आहे बांधावरचे वास्तव?

Video | भररस्त्यात रेड्यांची टक्कर ! मग काय बघ्यांची गर्दी अन् वाहतूकीचे तीन तेरा

खरीप-रब्बी बेभरवश्याचीच, आता शाश्वत शेतीसाठी ‘हाच’ शेतकऱ्यांकडे पर्याय…!

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.