AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia : धान खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने खरेदी रखडली

धान खरेदीची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ही असणार आहे. यापुर्वीच शेतकऱ्यांना धानाची खरेदी करावी लागणार आहे. अशातच नोंदणी एका केंद्रावर आणि खरेदी दुसऱ्या केंद्रावर केल्यावर बिलाला अडचणी येतील अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणे सौंदड येथील खरेदी केंद्रावरच धान घ्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे.

Gondia : धान खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने खरेदी रखडली
धान पिकाच्या विक्रीवरुन गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर एकच गोंधळ घातला
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 3:57 PM
Share

गोंदिया : यंदाच्या हंगामात (Paddy Crop) धान खरेदी केंद्रावर विक्रीपेक्षा येथील असुविधा आणि शेतकऱ्यांची केलेली गैरसोय यामुळेच जिल्ह्यातील केंद्र ही चर्चेत राहिलेली आहेत. आता कुठे (Irregularities in procurement) खरेदीमधील अनियमितता प्रकरण मिटले आहे. असे असतानाच येथील खरेदी केंद्रावर ऑनलाईनची नोंदणीच होत नसल्याने शेतकऱ्यांचे धान्य घेतले जात नाही. त्यामुळे खरेदी केंद्र उभारुन तरी काय उपयोग अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खरेदी केंद्रावर हा गोंधळ उडाला आहे. धानाची ऑफलाईन खरेदी केल्यावर त्याची दुसरीकडे (Online) ऑनलाईन नोंदणी होणे गरजेचे असते, पण तसे होत नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावरील कर्मचारी आणि शेतकरी यांच्यामते मतभेदही निर्माण झाले आहेत. आता हा निर्णय जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

पर्यायी मार्गही ठरला अडचणीचा

सौंदड येथील सहकारी भात गिरनी येथील धान खरेदी केन्द्रने परिसरातिल शेतकऱ्यांची धान खरेदी केली. मात्र अचानक या संस्थेची मान्यता रद्द झाल्याने धान खरेदी करण्यास शासनाने नकार दिला. त्यामुळे शासनाच्या पोर्टल वर ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने ऑफ लाइन खरेदी केलेला धान परत करण्याची वेळ केंद्र सचालकांना आली. यावर पर्याय म्हणून गिरोला हेटी येथील केंद्रावर धानाची खरेदी होईल असे सांगण्यात आले होते पण आता खरेदीचे तीनच दिवस उरले असताना बिले कसी अदा होणार. त्यामुळे सौंदड येथील केंद्रावरच खरेदी करुन घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांची नेमकी अडचण काय ?

धान खरेदीची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ही असणार आहे. यापुर्वीच शेतकऱ्यांना धानाची खरेदी करावी लागणार आहे. अशातच नोंदणी एका केंद्रावर आणि खरेदी दुसऱ्या केंद्रावर केल्यावर बिलाला अडचणी येतील अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणे सौंदड येथील खरेदी केंद्रावरच धान घ्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. आता यावर जिल्हा मार्केटींग अधिकारी हे काय तोडगा काढतात हे पहावे लागणार आहेत.

खरेदीविनाच धानाची वापसी

खुल्या बाजारपेठेपेक्षा खरेदी केंद्रावर अधिकचा दर मिळतो म्हणून याच ठिकाणी धानाची घालण्याची शेतकऱ्यांची धडपड असते. पण खरेदी केंद्रचालकांच्या मनमानी कारभारामुळे धानाची खरेदी तर होत नाही पण इतर बाबींचाच अधिकचा सामना करावा लागतो. सौंदड धान खरेदी केंद्रातून धान परत करताच शेतकऱ्यांनी एकच गोंधळा घातला. यावेळी परिसरातील 100 शेतकरी उपस्थित होते.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.