AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Factory :अतिरीक्त साखरेवर आता इथेनॉल निर्मितीचा रामबाण पर्याय, देशातील इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा

सन 2020 - 21 मध्ये देशात 302 कोटी लिटरचे इथेनॉल निर्मित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांतून 80 कोटी लिटरचे योगदान देण्यात आले आहे. इथेनॉल निर्मितीवर सरकारचा मोठा भर असून यातून शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढणार आहे. राज्यातील 78 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत.

Sugar Factory :अतिरीक्त साखरेवर आता इथेनॉल निर्मितीचा रामबाण पर्याय, देशातील इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 12:39 PM
Share

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून ( Ethanol production) इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमात इथेनॉल निर्मितीचे महत्व पटवून सांगितलेले आहे. सन 2020 – 21 मध्ये देशात 302 कोटी लिटरचे इथेनॉल निर्मित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Sugar factories) साखर कारखान्यांतून 80 कोटी लिटरचे योगदान देण्यात आले आहे. इथेनॉल निर्मितीवर सरकारचा मोठा भर असून यातून शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढणार आहे. राज्यातील 78 साखर कारखान्यांनी (ethanol manufacturing projects) इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. यामधून इथेनॉलची निर्मिती अजून वाढले असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इथेनॉलपासून मिळणारे उत्पन्न

इथेनॉल निर्मितीची मदत इंधनामध्ये तर होणारच आहे. पण यामधून साखर कारखान्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. ज्या साखर कारखान्यांकडे स्वत:चे प्रकल्प नाहीत अशा कारखान्यांनी ऊसाच्या गाळपानंतर तयार होणारा कच्चा माल हा ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यांना देऊन इथेनॉलची निर्मिती करुन घ्यावयाची आहे. सी हेवी या कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉल 45 रुपये लिटर तर बी हेवीपासून 55 रुपये व थेट ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल 65 रुपये तेल कंपन्या ह्या खरेदी करतात. राज्यातील 80 कोटी लिटरच्या इथेनॉल निर्मितीतून 4 हजार 500 कोटी रुपये मिळाले असल्याचा अंदाज आहे. तर तेल कंपन्या हे पैसे 15 दिवसांमध्ये देतात हे विशेष

सरकारचे काय आहे उद्दीष्ट?

इंधनासाठी इथेनॉलचा उपयोग होतो म्हणून इथेनॉलची निर्मितीवर भर द्यावा असे अवाहन सातत्याने केले जात आहे. यंदाच्या हंगामात सरकारने 120 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. एवढेच नाही तर इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प उभा करायचा असल्यास साखर कारखान्यांनी कर्ज घेतल्यास त्याच्या व्याजावर केंद्र सरकारने अनुदान सुरु केले आहे. राज्यातील 67 खासगी व 64 सहकारी साखर कारखान्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. गतवर्षी कंपन्यांना 80 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा साखर कारखान्यांनी केला होता.

साखरेचे अतिरीक्त उत्पादन

गेल्या काही वर्षापासून राज्यात साखरेचे अतिरीक्त उत्पादन होत आहे. यंदा तर पोषक वातावरणामुळे ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अतिरीक्त उत्पादनामुळे साखऱ कारखानदार यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती. मात्र, आता त्याला इथेनॉल निर्मितीचा पर्याय समोर आला आहे. कारखाने व ऊस उत्पादकांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प हे काही मर्यादित साखर कारखान्यांकडेच आहेत. त्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्या नंतरच इथेनॉलची निर्मिती होणार आहे.

संबंधित बातम्या :

कृषी आयुक्तांची अनोखी शक्कल, आता वाढणार शेतीमालाची निर्यात..!

अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांचे काय आहे चित्र ? नुकसानीमुळे बाजारपेठेवर परिणाम

किटकनाशक फवारणीसाठी ‘ड्रोन’ चा वापर करताय ? मग कृषी मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन कराच

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.