AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांचे काय आहे चित्र ? नुकसानीमुळे बाजारपेठेवर परिणाम

द्राक्षांची तोडणी तर 10 दिवसांवर आली असतानाच अवकाळीने घात केला आणि द्राक्षांच्या मणी केव्हा मातीमोल झाले हे शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आले नाही. यामुळे नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षबागांचे तब्बल 3 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांचे काय आहे चित्र ? नुकसानीमुळे बाजारपेठेवर परिणाम
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 10, 2021 | 11:04 AM
Share

सांगली : अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा आणि ( Damage to vineyards) द्राक्ष बागांवर झालेला आहे. द्राक्षांची तोडणी तर 10 दिवसांवर आली असतानाच (untimely rains) अवकाळीने घात केला आणि द्राक्षांच्या मणी केव्हा मातीमोल झाले हे शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आले नाही. यामुळे नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षबागांचे तब्बल 3 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. उत्पादनात थेट 50 टक्क्यांनीच घट झाली आहे. केवळ आर्थिक नुकसानच नाही तर आता हंगामाच्या अखेरपर्यंत या अवकाळी पावसाच्या झळा कायम राहणार आहेत. शिवाय आता हवामान निरभ्र राहिले तरच उर्वरीत बागांमधून उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.

नेमका फळांवर काय परिणाम झाला ?

द्राक्षांच्या बागा ह्या अंतिम टप्प्यात होत्या. तोडणीची कामे अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपली होती. असे असताना पावसाने हजेरी लावल्याने तोडणीला आलेल्या द्राक्ष बागांचे जवळपास 50 ते 60 टक्के नुकसान हे झाले आहे. शिवाय उर्वरीत झाडावरील द्राक्षांनाही तडे गेले आहेत. द्राक्षांचा दर्जा ढासळल्याने आता निर्यातीवरही त्याचा परिणाम होणार आहे. द्राक्षांचेच नुकसान झाल्याने आता मनुकेही तयार होणार नाहीत. मणीगळ झाल्याने राहिलेल्या मण्यांचा आकार आता वाढणार आहे. बेदाण्याचे उत्पादन हे कमी होणार आहे.

बाजारपेठेवरही परिणाम

यंदा पावसामुळे द्राक्षाचे उत्पादन तर घटणारच आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की, द्राक्षांचेदेखील दर वाढणार आहेत. फेब्रुवारीला आवक सुरु होताच दर हे चढेच राहणार आहेत. महिनाभर हीच अवस्था राहिल्यानंतर मात्र, मार्चनंतर दर हे कमी होतील असा अंदाज आहे. उत्पादन घटल्यामुळे निर्यातीचे दर वाढणार आहेत. निर्यातीच्या वाढत्या दराचा परिणाम देशातील स्थानिक बाजारपेठेवरही होणार आहे. त्यामुळे तीन दिवस झालेल्या अवकाळीचा परिणाम वर्षभर जोपासलेल्या बागांवर झालेला आहे. गतवर्षी राज्यातून द्राक्षाची निर्यात ही 2 लाख 46 हजार 535 मेट्रीक टन झाली होती. यंदाही निर्यातीवर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे.

न भरुन निघणारे नुकसान

द्राक्ष बागांना केवळ रोगराईचा प्रादुर्भाव झाला म्हणूनच नाही तर वर्षभर विविध फवारण्या कराव्या लागतात. याकरिता योग्य नियोजन असले तर हे पिक शेतकऱ्यांच्या पदरात पडते. मात्र, निसर्गापुढे शेतकरीही हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्षांची पडझड झाली आहे. त्यामुळे घडकुज, मनीगळ, फुलोऱ्याचे नुकसान झाले आहे. मनीगळ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता मोठ्या साईजचा बेदाणा तयार होणार आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन हे कमी होईल पण निर्यातीवर परिणाम होऊ दिला जाणार नाही.

महाराष्ट्रातली द्राक्ष ‘लई भारी’

महाराष्ट्रातील द्राक्षांना एक वेगळा गोडवा आहे. म्हणूनच देशातील एकूण द्राक्ष निर्यातीपैकी 90 टक्के द्राक्ष ही एकट्या महाराष्ट्रातून नर्यात होतात. तर महाराष्ट्रातून एकट्या नाशिक जिल्ह्यातून 90 टक्के द्राक्षे ही निर्यात केली जातात. आता मराठवाड्यातही द्राक्षे क्षेत्र वाढत आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाचा लहरीपणाचा फटका हा द्राक्ष बागायतदारांना बसत आहे. देशातून इंग्लड, नेदरलॅंड, जर्मनी, फिनलॅंड यासह इतर देशांमध्ये निर्यात ही केली जाते.

संबंधित बातम्या :

किटकनाशक फवारणीसाठी ‘ड्रोन’ चा वापर करताय ? मग कृषी मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन कराच

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पायाभूत अन् प्रमाणित बियाणांच्या बिजोत्पादनासाठी शासनाचे अनुदान, असा घ्या लाभ

उत्पादनापेक्षा खाद्यतेलाच्या मागणीत वाढ, केंद्र सरकारचे मात्र स्वावलंबनाचे प्रयत्न

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं