AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पारंपारिक शेतीला युवा शेतकऱ्यांचा रामराम, फळबागेकडे तरुण शेतकऱ्यांचा कल, युवा शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल

भाजीपाला पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने "उत्पन्नापेक्षा खर्च जादा "अशाप्रकारची परीस्थीती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकरी फळबाग लावण्याकडे वळले आहेत.

पारंपारिक शेतीला युवा शेतकऱ्यांचा रामराम, फळबागेकडे तरुण शेतकऱ्यांचा कल, युवा शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल
युवा शेतकरी
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jul 08, 2021 | 5:09 PM
Share

पुणे: गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या पाश्वॅभुमिवर शेतीसाठी लागणारी मजुरांची कमतरता आणि कमी पर्जन्यमान शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच पिकांवर होणारे नवनवीन रोगाचे आक्रमण यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजीपाला पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने “उत्पन्नापेक्षा खर्च जादा “अशाप्रकारची परीस्थीती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकरी फळबाग लावण्याकडे वळले आहेत. राजुरी येथील सागर खोमणे एम.बी.ए.झालेल्या शेतकरी तरूणाने आपल्या पाच एकर क्षेत्रात सीताफळ लागवड केली आहे. सागर खोमणे सीताफळाच्या उत्पादनातून वर्षाकाठी दीड ते 2 लाखाच्या आसपास उत्पन्न मिळवतोय. (Pune Junnar Farmers move to horticulture due to various problems in traditional agriculture)

तरुणांकडून फळबागेतून आर्थिक स्वयंपूर्णता मिळवण्याचा प्रयत्न

कोरोना विषाणू संसर्ग आणि त्यानंतर करण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळं अनेक तरुणांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरूण नोकरीच्या मागे न लागता आधुनिक आणि कमीत कमी खर्च लागणा-या फळबागेच्या माध्यमातून आपला आर्थिक रोजगार शोधत आहेत.

राजुरी येथील सागर खोमणे एम.बी.ए.झालेल्या शेतकरी तरूणाने आपल्या पाच एकर क्षेत्रात सीताफळ लागवड केली आहे. सागर खोमणे सीताफळाच्या उत्पादनातून वर्षाकाठी दीड ते 2 लाखाच्या आसपास हमखास आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसून येत आहे.विशेष म्हणजे सीताफळ झाडाला कुठल्याही प्रकारचे खतं तसेच औषधे आणि मजुरीचा खर्च कमी येत असल्याने हमखास उत्पन देणारे पीक म्हणून शेतकरी पाहत आहेत.

फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारनं 2018-19 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केलीय. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. तर, कोकणासाठी ही अट शिथील करण्यात आली असून तेथील शेतकऱ्यांना 10 गुंठे जमीन असली तरी या योजनेचा लाभ दिला जातो. कोकणातील कमाल जमीन धारणा मर्यादा 6 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ही मर्यादा 10 हेक्टर पर्यंत आहे. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याला उपलब्ध क्षेत्रात एकापेक्षा जास्त फळपिकांची लागवड करता येते. राज्य शासनाच्या इतर फळबाग योजनेंचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेला लाभ घेता येत नाही.

पात्रतेचे निकष

वैयक्तिक शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करु शकेल. शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असणं आश्यक आहे. शेतकऱ्याचं कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून असेल त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाते. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्पव व अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.

योजनेत समाविष्ट असलेली फळपिके

नारळ, काजू, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कांदी लिंबू, सिताफळ, आवळा,चिंच, जांभूळ, फणस, अंजिर,चिकूस, आंबा, कोकम

इतर बातम्या:

उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले

यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई

(Pune Junnar Farmers move to horticulture due to various problems in traditional agriculture)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली