AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणं राज्य भरात शेतरस्ते समन्वयातून खुले केले जात आहेत. शेतकऱ्यांकडून देखील जुने वाद विसरून शेतररस्ते खुले करण्याचं काम सुरु आहे. farm roads

उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हाकेला शेतकऱ्यांची साद, बांधांचे वाद मिटवून 150 कि.मी.चे शेतरस्ते खुले
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 11:48 PM
Share

उस्मानाबाद: महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणं राज्य भरात शेतरस्ते समन्वयातून खुले केले जात आहेत. शेतकऱ्यांकडून देखील जुने वाद विसरून शेतररस्ते खुले करण्याचं काम सुरु आहे. शेतरस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यासंमोरील अनेक अडचणी दूर होणार आहेत. शिवाय अनेक पिढ्यांपासून सुरु असलेले वाद संपुष्ठात येणार आहेत. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्ह्यात 150 किमी पेक्षा अधिक शेतरस्ते खुले करण्यात आले आहेत. (Osmanabad 150 km farm roads open after appeal of collector kaustubh diwegaonkar)

उस्मानाबादमध्ये 150 किमी पेक्षा अधिक रस्ते खुले

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतरस्ते खुले करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांचे बांधावरचे वाद , रस्त्याच्या अडचणी मिटत आहेत. जिल्ह्यात जवळपास 150 किमी पेक्षा जास्त शेतरस्ते अतिक्रमण मुक्त केले आहेत. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

3 महिन्यात 5 किमी शेतरस्त्याचे मातीकाम पूर्ण

उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी या गावात 5 किलोमीटर शेतरस्ताचे मातीकाम अवघ्या 3 महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. यातील काही रस्त्यांचा वाद हा गेल्या दोन पिढ्यापासून सुरू होता. मात्र तो गावकर्‍यांनी एकत्र येत सामंजस्याने सोडविला असून तो आता कायमचा संपुष्टात आला आहे.

पिढ्यानं पिढ्यांचे बांधाचे वाद संपुष्टात

शेतरस्त्याचे मातीकाम लोकसहभागातुन पूर्ण झाले आहे. शेतकर्‍यांचा पिढ्यान्पिढ्याचा बांधाचा वाद संपुष्टात आले आहेत. शेतीसाठी पेरणीपासून काढणीपर्यंतचा मार्ग सुकर व्हावा य, साठी सर्व शेतकर्‍यांना विश्वासात घेवून शेतरस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलं आहे. गावकऱ्यांनी 5 कि.मी.चे शेतरस्ते तीन महिन्यात पूर्ण करुन दाखवत गावाच्या नावाचा डंका कावळेवाडी गावानं वाजवला आहे.

75 ते 100 मिमी पावसाशिवाय पेरणी करु नका

गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते.  सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई

बार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा

(Osmanabad 150 km farm roads open after appeal of collector Kaustubh Diwegaonkar)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.