AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्पादनात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांची एस आर टी पद्धतीच्या भात लागवडीला पसंती

मागच्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची काम उरकली आहेत.

उत्पादनात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांची एस आर टी पद्धतीच्या भात लागवडीला पसंती
PUNE MAVAL RICE CULTIVATIONImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2023 | 9:48 AM
Share

मावळ : मावळ (PUNE MAVAL) भागात भात पीक लागवडीसाठी (RICE CULTIVATION) समाधानकारक पाऊस सुरू असल्याने, भाताचे आगार असलेल्या पवनमावळात शेतकऱ्यांची खरीप हंगामात इंद्रायणी भात लागवडीसाठी तयारी पुर्ण झाली असून एस आर टी पद्धतीने भात लागवडी पुर्ण केल्या जात आहेत. महाराष्ट्रात (MAHARASHTRA RAIN UPDATE) अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. महाराष्ट्रात उशिरा पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत होता. एस आर टी (SRT) पद्धतीने भाताची लागवड केल्यास उत्पादन अधिक होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीच्या भात लागवडीला पसंती दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत मागच्या काही दिवसांपासून प्रशिक्षण घेतली जात आहेत. भात उत्पादन वाढीसाठी तुंग किल्ला परिसरात सगुणा राइस तंत्र (SRT) भात लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण मावळ कृषी अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत. या प्रशिक्षणात गादी वाफ्यावर लोखंडीसाच्या साहाय्याने पेरणी करून लागवड केली जात आहे. या पद्धतीमध्ये चिखलनी, पुर्नलागवड करण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर उत्पादनात वाढ होते, यामुळे शेतकरी या लागवडीला अधिक पसंती देतात.

मागच्या दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पाऊस सुरू आहेत. पावसामुळे माळशेज घाट परिसरातील धबधबे ही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे त्या भागातला निसर्ग सौंदर्य बहरलाआहे. फुललेला निसर्ग पाहण्यासाठी लोकं तिथं येत आहेत.

हवामानाचा अंदाज चुकत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जुलै महिना सुरू झाला, तरी वाशिम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. पेरण्यासाठी उशीर होत असल्याने उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे. त्यातच आता पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना आपलं पेरणी केलेलं पीक वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.