AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्यात पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, काडणीला आलेली पीकं खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत

वीज पडल्याने तीन बैलांचा मृत्यू देखील झाला आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे हे गुरुवार नंतर होणार आहे. कारण होळी धुलीवंदन या सणांची सुट्टी असल्याने हे पंचनामे गुरुवारपासून सुरू होतील असा अंदाज आहे.

या जिल्ह्यात पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, काडणीला आलेली पीकं खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत
Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 06, 2023 | 8:22 AM
Share

धुळे : धुळे (DHULE) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे चारशे एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Damage crops) झाले आहे. दोन तालुक्यात सुमारे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिदखेडा या दोन्ही तालुक्यात रब्बी पिकांना त्याचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास फिरवून गेला आहे. काल झालेल्या पावसामुळे शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यातील काही भागांना याचा फटका बसला. यात गहू, हरभरा, केळी, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरपूर (SHIRPUR) तालुक्यात साधारण दोनशे हेक्टर वरील पिकांना त्याचा फटका बसला असून वीस लाखाचे नुकसान झाले आहे.

तीन बैलांचा मृत्यू

वीज पडल्याने तीन बैलांचा मृत्यू देखील झाला आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे हे गुरुवार नंतर होणार आहे. कारण होळी धुलीवंदन या सणांची सुट्टी असल्याने हे पंचनामे गुरुवारपासून सुरू होतील असा अंदाज आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले असून, केळीच्या फळबागा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. केळीच्या बागांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता शासनाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अनेक ठिकाणी तूरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.

मालेगाव शहरात मुसळधार

विजाचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने मनमाड शहर परिसराला काढले झोडपून काढले. सुरुवातीला झाला जोरदार पाऊस त्यानंतर रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात साचले आहे. गहू, कांदा, हरभरा यासह इतर पिकांचे झाले मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहे.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......