AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal : शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईचाच आधार, खरिपानंतर रब्बी पिकेही पाण्यात

ज्वारीची काढणी झाली की कडबा एकत्र करुन तो साठवला जातो. या कडब्याचाच आधार शेतकऱ्यांना पूर्ण वर्षभर असतो. मात्र, यंदा गंजी लावल्या की लागलीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चारा पिकाचेही नुकसान झाले आहे. कडबाही भिजल्याने आता ते जनावरांना खाण्यायोग्य राहिलेला नाही.

Yavatmal : शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईचाच आधार, खरिपानंतर रब्बी पिकेही पाण्यात
यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिंकासह फळबागांचेही नुकसान झाले आहे,Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 10:15 AM
Share

यवतमाळ : खरीप, फळबागानंतर आता रब्बी हंगामातील पिकांवरही अवकाळीची अवकृपा ही कायम राहिलेली आहे. पीक पदरात पडण्यापूर्वीच  (Unseasonable Crop) अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी हे (Rabi Season) रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाची अशी ही अवकृपा. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण आता शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी होत आहे. यंदा दोन्ही हंगामातील पिकांवर पावसाचा परिणाम झाला आहे.

काढणीला आलेली ज्वारीही भुईसपाट

रब्बी हंगामातील पोषक वातावरणाचा फायदा पिकांना झाला होता. वाढही जोमात झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा होती. एवढेच नाहीतर ज्वारी हे मुख्य पीक काढणीला आले असतानाच महागाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये काळी दौलत खान येथील अल्पभूधारक शेतकरी अमोल बगाटे या शेतकऱ्याच्या शेतातील दोन एकर ज्वारीचे पीक हे वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे चार महिन्याची मेहनत तर वाया गेलीच पण आर्थिक नुकसानही झाले आहे. खरिपात सुरु झालेली नुकसानीची मालिका आता रब्बीतही कायम आहे. त्यामुळे शासनाने पीक पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

साठवणूक केलेल्या चाऱ्याचेही नुकसान

ज्वारीची काढणी झाली की कडबा एकत्र करुन तो साठवला जातो. या कडब्याचाच आधार शेतकऱ्यांना पूर्ण वर्षभर असतो. मात्र, यंदा गंजी लावल्या की लागलीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चारा पिकाचेही नुकसान झाले आहे. कडबाही भिजल्याने आता ते जनावरांना खाण्यायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे न भरुन निघणारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा

महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथील अमोल बगोटे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. असे असताना त्यांनी वर्षभर रोजी-रोटीचा प्रश्न मिटावा आणि जनावरांना चाराही उपलब्ध व्हावा या उद्देशाने ज्वारीची पेरणी केली होती. सर्वकाही सुरळीत असताना एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले आहे. त्यांची 2 एकरातील ज्वारी ही भुईसपाट झाली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळाली तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Follow Us
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.